• मुख्य पृष्ठ
  • माझ्याविषयी
  • लोकनेते
  • लातूर ग्रामीण
  • मीडिया
  • पुढाकार
    • रुग्णालयांची यादी
  • महत्त्वपूर्ण दुवे
  • संपर्क
    • माझ्याशी जोडले जा
    • अर्ज नोंदवा
    • अर्ज शोधा
    • संवाद साधा
...
अधिक माहिती

लोकनेते

  1. मुख्य पृष्ठ
  2. लोकनेते

Aug 31, 2017
The Prime Minister, Dr. Manmohan Singh, Chief Minister of Maharashtra, Shri Vilasrao Deshmukh alongwith other dignitaries are arriving at a function for the dedication of two rectors to the Nation at Tarapur Atomic Power Plant in Tarapur, Maharashtra on August 31, 2007.

Jun 28, 2012
The Union Minister for Science and Technology and Earth Sciences, Shri Vilasrao Deshmukh assumes the additional charge of the Union Minister for Micro, Small and Medium Enterprises, in New Delhi on June 28, 2012

Jun 21, 2012
Vilasrao Deshmukh addressing the first RIMES (Regional Integrated Multi-Hazard Early Warning System for Africa and Asia (RIMES) Ministerial Conference, in New Delhi. The Minister of State for Planning

Jun 21, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences, Dr. Ashwani Kumar with the MinistersAmbassadors of RIMES Members

May 15, 2012
Vilasrao Deshmukh at the releasing of the Book "A Global Parliament", in New Delhi on May 16, 2012.

May 11, 2012
A.P.J. Abdul Kalam launching the Global Innovation & Technology Alliance, at the celebration of the Technology Day 2012, in New Delhi. The Union Minister for Science and Technology and Earth Sciences

May 08, 2012
Vilasrao Deshmukh addressing the media on India US Partnering for Innovative Solutions, in New Delhi on May 08, 2012. The US Secretary of State, Ms. Hillary Clinton is also seen

May 07, 2012
Vilasrao Deshmukh with the Minister of Health, Welfare and Sports, Netherlands, Ms. Edith Schippers, at the delegation level meeting, in New Delhi

Apr 27, 2012
The Union Minister for Science and Technology and Earth Sciences and Vice President, CSIR, Shri Vilasrao Deshmukh addressing the media on the occasion of the CSIR Leadership Conference, at IMT Chandigarh. The DG, CSIR

Apr 26, 2012
Vilasrao Deshmukh addressing the press conference on the First Stage Long Range Forecast (LRF) for 2012 South-West Monsoon rainfall, in New Delhi. The Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences

Apr 24, 2012
Ghulam Nabi Azad launching the new Anti Malaria Drug on World Malaria Day, in New Delhi. The Union Minister for Science and Technology and Earth Sciences, Shri Vilasrao Deshmukh, the Chairman, Ranbaxy Laboratories Ltd

Apr 20, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister for Universities and Science, Mr. David Willets, signing the protocol of 3rd meeting of India UK Science and Innovation Council, in London on April 20, 2012

Mar 30, 2012
Vilasrao Deshmukh flagging off the first test-run of a fully loaded TAVERA (a regular diesel vehicle) on neat (B100) “microalgal biodiesel”, in New Delhi. The Secretary, DSIR & DG CSIR

Mar 30, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister of Science and Technology & Innovation of Brazil

Mar 02, 2012
Vilasrao Deshmukh, the Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences

Load more
विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास - मा. उल्हासदादा पवार

विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास - मा. उल्हासदादा पवार

विलासराव देशमुख यांच्या आठवणी अण्णा हजारे यांच्या शब्दात

विलासराव देशमुख यांच्या आठवणी अण्णा हजारे यांच्या शब्दात

Ghe Bharari Official Song

Ghe Bharari Official Song

Hon. Vilasrao Deshmukh Speech

Hon. Vilasrao Deshmukh Speech

फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

NDTV - In conversation with Shri. Vilasraoji Deshmukh

NDTV - In conversation with Shri. Vilasraoji Deshmukh

मा.खा . यशवंतरावजी गडाख साहेब लिखित सहवास पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे दिलखुलास मनोगत.

मा.खा . यशवंतरावजी गडाख साहेब लिखित सहवास पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे दिलखुलास मनोगत.

रमेशचंन्द्रजी कानडे यांचे

रमेशचंन्द्रजी कानडे यांचे 'विचार संहिता' या पुस्तक प्रकाशन सोहळ्या मधील साहेबांचे उत्तम भाषण

कै.नरुभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार,पुणे

कै.नरुभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार,पुणे ' या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब

Hon. Vilasraoji Deshmukh Interview on SAAM MARATHI

Hon. Vilasraoji Deshmukh Interview on SAAM MARATHI

मराठवाडा भूषण गौरव पुरस्कर सोहळा

मराठवाडा भूषण गौरव पुरस्कर सोहळा

मा. शरद पवार यांच्या बद्दल  - मा. विलासरावजी देशमुख यांचे हितगुज

मा. शरद पवार यांच्या बद्दल - मा. विलासरावजी देशमुख यांचे हितगुज

Speech by Shri Vilasrao Deshmukh at Khedut Shibir

Speech by Shri Vilasrao Deshmukh at Khedut Shibir

Load more
  • #आठवणीसाहेबांच्या 261 Sep 03, 2023
     
    विलासरावजींनी कायम मैत्री जपली...
    विलासरावजी आणि मी कॉलेज जीवनापासूनचे मित्र होतो. गरवारे कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश घेतला तेव्हा दररोज संध्याकाळी आमची भेट खेळाच्या मैदानावर व्हायची. आम्ही तेव्हा व्हॉलीबॉल खेळायचो, खेळातूनच आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. धनाजी साठे, जी.एस.पाटील अशा काही मित्रमंडळींसोबत आम्ही डेक्कन येथील पुना कॉफी येथे तासनतास गप्पा मारत बसायचो. आमच्या कॉलेजच्या जवळच फिल्म इंस्टीट्यूट होते. तेथे जया भादुरी,शत्रूघन सिन्हा अशी काही कलाकार मंडळी आम्हाला नजरेस पडायची. विलासरावजी देखील एखाद्या हिरो सारखे दिसायचे.विलासरावजींना मोटरसायकलची खूप आवड होती.पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना राजदूत गाडी त्यांनी खरेदी केली होती. त्याकाळी गाडी खरेदी करणे खूप कौतुकाचे समजले जायचे. विलासरावजी पूर्वीपासूनच खूप चांगले मित्र म्हणून परिचित होते. एखाद्या सोबत मैत्री केली तर ती शेवटपर्यंत टिकवायची हा त्यांचा स्वभाव होता. कोणत्याही मोठ्या पदावर असले तरी मैत्रीत कधी दुरावा त्यांनी येऊ दिला नाही.हे त्यांचे स्वभावातील एक वैशिष्ट्य होते.सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे विलासरावजी एक सच्चे व दिलदार मित्र होते.

    शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथून लातूरला आम्ही आलो. तेव्हा प्रदीप राठी यांच्या दुकानी दररोज सायंकाळी आम्ही एकत्रित जमायचो. तेव्हापासूनच एक उमदा नेता म्हणून विलासरावजींकडे पाहिले जात होते.सतत इतरांच्या कामासाठी धावपळ करत असलेले विलासरावजी काही वर्षातच आमदार झाले. मला अजूनही आठवतं मी माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. मी आवर्जून येणार असा शब्द त्यांनी मला दिला. राजदूत गाडीवर ते माझ्या लग्नासाठी आले होते. कालांतराने माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी नक्की येणार असा शब्द मला दिला. माझ्या लग्नाच्या वेळी साहेब कोणत्याच पदावर नव्हते आणि मुलाच्या लग्नाच्या वेळेस ते मुख्यमंत्री होते. व्यस्त कामकाजामुळे ते मुलाच्या लग्नाला येतील की नाही असे वाटत होते. मात्र वेळात वेळ काढून खास हेलिकॉप्टर मधून ते आमच्या आनंदात सहभागी झाले होते. मैत्री जपणारे विलासरावजी कायम आमच्या मनात घर करून आहेत.
    - श्री.रावसाहेब पाटील सास्तुरकर, सास्तुर ता.लोहारा जि.उस्मानाबाद
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 260 Aug 27, 2023
     
    साहेबांनी केलेली मदत मला लाख मोलाची आहे...
    माझे वडील शिवराजअप्पा आष्टके हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सैनिक.लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचे अफाट चाहते.लातूरलाआले की साहेबांना भेटून गावच्या अडीअडचणी मांडायचे.मी लहान होतो मला ही साहेबांबद्दल आकर्षक वाटू लागले.कधी कधी मी आण्णा सोबत साहेबांना भेटायला जायचो.मला बोलता ही यायचे नाही आणि ऐकू ही यायचे नाही फक्त हाताच्या इशारावर माझी भाषा साहेबांना कळायची.
    माझे वडील हे वडवळ (ना.)ता.चाकूर जि.लातूर येथील विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन होते.1994 ला सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी साहेब आले होते.त्यानंतर अनेक वेळा विविध कार्यक्रमाला साहेब आले.मी 1994 ला 10 वी पास झालो आणि नोकरी मागण्यासाठी आण्णा सोबत साहेबांकडे गेलो.एक क्षणात साहेबांनी अर्जावर काहीतरी लिहून पी.ए.कडे दिले.काही दिवसांनी मतिमंद विद्यालय लातूर येथे काळजीवाहक म्हणून नोकरी दिली.या कामी जिवन विकास प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विजयगोपाल अग्रवाल यांनी मोलाचे सहकार्य केले.माझ्या जिवनात साहेबांचे स्थान सर्वोच्च आहे. साहेबांनी माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला केलेली मदत लाख मोलाची आहे.
    आज माझी पत्नी ,दोन्ही मुले आनंदी आहोत.मुलगा आकाश हा डिझायनर इंजिनियर असून आदित्य 10वी शिकत आहे.मुलांना चांगल शिक्षण देणे हे साहेबांमुळे शक्य झाले आहे.साहेबां सोबतच्या माझ्याकडे जवळपास 35 फोटो संग्रही आहेत.साहेब मुख्यमंत्री असताना दिव्यांगाना बस प्रवासात 1/4 तिकीट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतले.मुंबईत आम्हा दिव्यांगाना बोलावून त्यांच्या शुभहस्ते ओळखपत्र दिले त्या क्षणाची आठवण कायम स्वरुपी ह्दयात राहिली असून साहेबांची आठवण आज देखील पदोपदी येत असते.
    - संजय शिवराज आष्टके, लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 259 Aug 20, 2023
     
    विलासरावजी कार्यकर्त्यांचे आवडते नेते होते...
    साधारण 1998 पासून लोकनेते विलासराव देशमुख साहेबांसोबत माझा परिचय होता.आमच्या भागातील नेते श्री सुरेश देशमुख यांच्यामुळे साहेबांशी असलेली ओळख अधिक घट्ट होत गेली. साहेबांनी नेहमीच आपल्या कार्यातून प्रेरणा दिली आहे. साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.प्रत्येकाला नावाने ओळखत असलेले विलासरावजी कार्यकर्त्यांचे आवडते नेते होते.

    गंगाखेडमध्ये स्थानिक पातळीवर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो.त्यावेळी साहेबांकडे पाहून मला खूप ऊर्जा मिळायची. आपणाकडे कोणते पद असो अथवा नसो, जनतेची कामे करत राहायची. ही शिकवण साहेबांनी आपल्या आचरणातून आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना दिली होती. पक्षासाठी काम करत असताना मला युवक काँग्रेस अध्यक्षपद मिळाले होते.तेंव्हा चांगले काम करा.अशा शब्दात त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक वैशिष्ट्ये आहेत.त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही कोणाच्याही कामाला नाही म्हणत नव्हते.आपल्या पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.एखाद्या व्यक्तीची साहेबांशी ओळख नाही व तो व्यक्ती जर आपल्या सोबत आला आणि साहेबांना त्याचे काम करण्यासाठी आपण जर विनंती केली. तर साहेब कामाचे स्वरूप जाणून घेऊन लागलीच संबंधितांना योग्य त्या सूचना द्यायचे आणि ते काम होऊन जायचे. शहर सेवा दलाचा मी अध्यक्ष असताना लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे श्रीमती सोनियाजी गांधी यांची सभा होती. त्या सभेसाठी जेव्हा लातूरला आम्ही आलो होतो तेव्हा तेवढ्या व्यस्ततेत देखील त्यांनी आमच्याशी संवाद साधला व काळजी सर्व काळजी घेतली होती.
    2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची आघाडी होती.आमच्या विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल जवादे हे उमेदवारी मागत होते.मात्र ती जागा मित्र पक्षाला सुटली असल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.अशावेळी मुंबईला विलासराव देशमुख साहेबांकडे आम्ही काही निष्ठावान कार्यकर्ते भेटण्यासाठी गेलो. साहेबांना स्थानिक पातळीवरील सर्व परस्थिती यापूर्वीच माहित होती. आम्हाला पाहून साहेब म्हणाले, तुम्ही का आलात हे मला माहित आहे. काळजी करू नका योग्य तो तोडगा काढला जाईल आणि खरंच साहेबांनी इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बोलून योग्य तो तोडगा काढला व आमची मागणी पूर्ण केली. साहेब खरच ग्रेट होते. त्यांच्यासोबत काम करत असताना खूप काही चांगले आम्हा सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना शिकायला मिळाले.याचा आनंद आयुष्यभर राहील.
    - श्री लक्ष्मण वसंतराव लटपटे,गंगाखेड जि.परभणी
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 258 Aug 13, 2023
     
    विलासरावजींनी नेहमीच इतरांचा सन्मान केला...
    कोणताही राजकीय नेता हा तेंव्हा श्रेष्ठ समजला जातो. जेंव्हा तो आपल्या सोबत इतरांची देखील काळजी घेतो. आपण मोठे होत असताना आपल्या सोबतच्या लोकांना देखील मोठे करत राहणे हेच खरे वैशिष्ट्य चांगल्या नेत्याचे असते. हेच वैशिष्ट्य मलाविलासरावजी देशमुख साहेबां मध्ये असल्याचे मला दिसून आले. गावातील राजकारणापासून सुरुवात करून राज्याच्या व देशाच्या राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करून जनसामान्यांत आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.सतत हसतमुख चेहरा,रुबाबदार व्यक्तिमत्व, प्रभावी भाषण,एखादा व्यक्ती लहान असो अथवा मोठा,
    सर्वांशी आपुलकीने ते वागत असत. इतरांचा सन्मान करणे हा देखील एक प्रमुख गुण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा होता. साहेबांनी जर एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द काही करून पाळत असत. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. आमच्या अहमदपूर तालुक्यातील बालाघाट सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. सर्वांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी दाखल केली होती. अनेक जणांनी संचालक होण्यासाठी नेतृत्वाकडे मागणी केली होती. त्यामुळे नेतृत्वाची अडचण झाली. कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. मी निश्चितपणाने निवडून येणार याची मला व माझ्या सहकाऱ्यांना खात्री होती. परंतु आमच्या पॅनलचा विजय होणे साठी काही व्यक्तींना आमच्या पॅनलमधून उमेदवारी देणे गरजेचे झाले होते. त्यामुळे पक्षातील काही ज्येष्ठ मंडळींनी मला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली व त्यासाठी मला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट करून देण्यासाठी घेऊन गेले. साहेबांनी सर्व परिस्थिती पाहून मला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले व तुमचा योग्य तो सन्मान आम्ही राखू असे सांगितले. त्यानंतर मी माझी उमेदवारी मागे घेतली. काही महिने गेल्यानंतर मला वाटलं निवडणूक झाली सर्व संपलं, आपल्याला काही संधी मिळत नाही. परंतु एके दिवशी मला फोन आला कारखान्यावर स्विकृत संचालक म्हणून विलासरावजींनी तुमची निवड केली असं सांगितल्यानंतर साहेबांनी दिलेला शब्द पाळला याची प्रचिती मला आली. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेवर देखील मला साहेबांनी स्विकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. ग्रामीण भागातील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम साहेबांनी नेहमी केले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.
    - अॅड.श्री.जी.टी.क्षीरसागर अंधोरी ता.अहमदपूर जि.लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 257 Aug 06, 2023
     
    त्यावेळी साहेबांनी तत्परतेने मदत मिळवून दिली...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेब नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर रहायचे. समाजात घडत असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पदावर असो अथवा नसो त्यांनी कधी सर्वसामान्यांना प्रति असलेली बांधिलकी कमी होवू दिली नाही. सतत जनसेवेत कार्यरत राहणे त्यांनी पसंत केले.मला अजूनही तो प्रसंग आठवतो जेव्हा साहेब अडचणीच्या काळात आम्हाला मदत करण्यासाठी आले होते. 1995 च्या दरम्यानचा तो प्रसंग आहे.साहेब तेव्हा कोणत्याही पदावर नव्हते, त्यावेळी आमच्या खडगाव भागात खूप मोठा पाऊस पडला होता. कधी नव्हे तो एवढा पाऊस पडल्याने सर्वजण अचंबित व भयभीत झाले होते.साहजिकच पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने त्या भागातील प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते. अचानक एवढे पाणी घरात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. अनेकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते.पावसाचे पाणी सर्वघरात पसरल्याने घरातील अनेक वस्तूंचे व जीवन उपयोगी साहित्याची नुकसान झाले होते.ती परस्थिती खूप भीतीदायक होती. साहेबांना ही माहिती मिळता क्षणी ते तत्परतेने आमच्या भागात आले. सर्व परस्थितीचा आढावा तर घेतलाच त्यासोबतच सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी बोलावून मदत कार्य सुरू केले भयभीत लोकांसोबत स्वतः साहेबांनी संवाद साधला. काळजी करू नका,आम्ही तुमच्या सोबत आहोत. असं सांगून त्यांनी तत्परतेने मदत पोहोचवली व धीर दिला.हे स्वतः प्रत्यक्षात पाहिले असल्याने मी साहेबांचा चाहता झालो. तेव्हापासून साहेबांच्या संपर्कात मी राहू लागलो. कालांतराने काँग्रेस पक्षाचा क्रियाशील सदस्य म्हणून मी काम करण्यास सुरुवात केली. पक्षा कडून त्यावेळी क्रियाशील सदस्य नोंदणी अभियानास सुरू करण्यात आली होती. प्रत्येकाला एक पावती बुक देण्यात आले होते. मात्र मी दहा पावती बुक घेतले होते. महिन्याभरात ते सर्व पावती बुक सदस्य नोंदणी करून मी संपवले होते. साहेबांना प्रत्यक्ष भेटून मी याविषयी माहिती दिली. तेव्हा त्यांनी माझे काम पाहून माझे कौतुक तर केलेच सोबतच, तेथे उपस्थित इतर कार्यकर्त्यांना म्हणाले पहा, असं झोकून देऊन काम करायला पाहिजे. साहेबांनी तेव्हा केलेले माझे कौतुक माझा आत्मविश्वास वाढवणारे होते.
    - अॅड.श्री. विजय काशिनाथ गायकवाड लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 256 Jul 03, 2023
     
    साहेबांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू लागले
    लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले.हे करत असताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी गावोगावी शिक्षण संस्था मंजूर करून दिल्या. जिल्हा परिषद असो अथवा खाजगी शाळा या दोन्हींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला हे मी जवळून पाहिले आहे.

    आमच्या भागातील प्रतिष्ठित व्यक्ती नजीर मामा यांच्या समवेत अनेकदा मला साहेबांची भेट घेता आली. जेंव्हा-केंव्हा आमची भेट व्हायची तेव्हा, गावाकडे काय चालू आहे? काही अडचण आहे का ? असं आवर्जून साहेब आम्हाला विचारायचे. काही अडचण असेल तर ती तत्परतेने सोडवायचे. नजीर मामा मांजरा कारखान्यावर संचालक असल्याने साहेबांना विनंती केली तेंव्हा. दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मंजुरी देऊन ती शाळा आमच्या गावात साहेबांनी सुरू करून दिली. या शाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.या शाळेतून साधारण ३०० विद्यार्थी शिक्षक झाले आहेत. तर १५० विद्यार्थी इंजिनिअर व काही प्राचार्य देखील झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द असल्याने त्याला योग्य साथ देण्याची गरज होती.साहेबांनी आमच्या गावात शाळा सुरू करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या त्या जिद्दीला बळ मिळाले. साहेबांमुळे आमच्या गावात सर्वात अगोदर बस सेवा सुरू झाली. विद्युत खात्याचे कार्यालय आले.गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण होण्यासाठी जे काही करणे गरजेचे होते. ते सर्व त्यांनी वेळो-वेळी केले.एवढे सर्व करून देखील साहेबांना कधीही गर्व आला नाही. ज्या जनतेने आपल्यावर जीवापाड प्रेम केले त्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कार्यरत राहायचे असं साहेब नेहमी म्हणायचे. कधीकाळी पश्चिम महाराष्ट्राला प्रगत समजले जायचे मात्र साहेबांनी उभी केलेली साखर कारखानदारीमुळे आपल्या देखील भागास मोठ्या कौतुकाने गौरविले जात आहे. हे केवळ साहेबांच्या दूरदृष्टी नियोजनामुळेच होऊ शकले. अशा महान व्यक्तिमत्त्वास मला जवळून पाहता आले. हे मी माझे भाग्य समजतो.
    - श्री पाटील राजेसाहेब रावसाहेब,बोपला ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 255 Jul 23, 2023
     
    आणि खरंच रेडिओ वरती आम्ही ती बातमी ऐकली...
    ज्या पद्धतीने असंख्य लोकांना साहेब आपलेसे वाटायचे त्याच पद्धतीने मला देखील विलासराव देशमुख साहेबां विषयी प्रचंड आकर्षण व आत्मीयता होती. गावातील नामदेवराव माने, श्रीरंग माने अशी काही मंडळी साहेबांचे लहानपणीचे वर्गमित्र होते. त्यामुळे ही सर्व मंडळी साहेबांना भेटण्यासाठी आवर्जून जात होती. तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत जायचो. साहेबांना जवळून पाहून मला खूप आनंद वाटायचा.ज्या व्यक्तीचा पेपर मध्ये फोटो पाहून व रेडिओ वरती ज्यांचे नाव सातत्याने ऐकायचो. त्या व्यक्तीला समोर पाहून समाधान वाटायचे.आमचे गावातील वडीलधारी मंडळी आज देखील साहेबांविषयी अनेक किस्से सांगतात. साहेब जेव्हा पंचायत समितीचे उपसभापती झाले तेव्हा मोठ्या उत्साहाने व जबाबदारीची जाणीव ठेवून ते काम करत असत. आमच्या भागात तेव्हा लाईटची सोय नव्हती,साहेबांनी खूप प्रयत्न करून आम्हाला लाईटची मंजुरी मिळवून दिली. एवढेच नाही तर लाईटचे पोल तत्परतेने उपलब्ध करून देऊन ते स्वतः गावात आले पोलउभा झाल्यानंतरच ते परत गेले. ही बाब आमच्या गावातील लोकांना खूप आवडली लोकप्रतिनिधी असावा तर असा,अशा शब्दात त्यावेळी साहेबांचे कौतुक केले जायचे. भावी आमदार म्हणून देखील त्यांना संबोधले जायचे. कालांतराने साहेब आमदार व मंत्री झाले.मंत्री असताना असेच एकदा साहेब आमच्या गावात आले होते.पाण्याच्या प्रश्नाविषयी सर्वांनी साहेबां कडे मागणी केली. साहेब तेव्हा म्हणाले मी तुम्हाला कायमस्वरूपी पाण्याची सोय करून देणार असून लवकरच ही बातमी तुम्ही रेडिओ वरती ऐका. (त्याकाळी टीव्ही फार कमी लोकांकडे असायचा व रेडिओ मोठ्या प्रमाणात असायचा) आणि काही दिवसातच रेडिओ वरती बातमी आली कासारखेडा येथे कोल्हापुरी बंधारा मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.तो ऐतिहासिक निर्णय घेऊन साहेबांनी कोल्हापुरी बंधारा उभारणी कामास प्रत्यक्ष सुरुवात करून दिली तसेच त्यावर गेट बसवून मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक करण्याची सोय केली. वाहून जाणारे पाणी गरजेनुसार शेतीस मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर बॅरिजेस मध्ये करून खूप मोठे वरदान आम्हा शेतकऱ्यांना त्यांनी दिले. बारा महिने पाणी शेतीस मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून आली. साहेबांचे दूरदृष्टी जनहिताची व विकासाची होती हे यावरून स्पष्ट होते.
    - श्री चंद्रकांत सखाराम शिंदे, कासारखेडा ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 254 Jul 16, 2023
     
    साहेबांमुळे शिक्षण संस्था मिळाली व मुलं शिकू लागली...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचा खूप जुना आमचा परिचय होता. शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या प्रचारा निमित्ताने साहेब सातत्याने आमच्या भागात यायचे. गावातील प्रत्येकाला भेटून काँग्रेस पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. खरं तर त्याचवेळी सर्वांना खात्री पटली होती की,साहेब लवकरच आमदार होतील आणि खरच तो योग जुळून आला.साहेबांना १९८० साली विधानसभेची उमेदवारी मिळाली,तेंव्हा आम्ही खूप आनंदित झालो होतो. साहेबांना काही करून निवडून आणायचे ही जिद्द उराशी बाळगून आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो. साहेबांचा जनसंपर्क गावो-गावी पूर्वीपासूनच असल्याने ते निवडून येणार हे निश्चित होते. मात्र तरी आम्हा कार्यकर्त्यांना सतर्क राहून प्रचार करण्यासाठी त्यांनी सांगितले होते.आपल्या उमेदीच्या काळातील कार्यकर्त्यांना साहेब कधीही विसरले नाहीत.जेंव्हा- केंव्हा एखादा कार्यकर्ता साहेबांकडे काम घेऊन गेला तेव्हा साहेबांनी तत्परतेने काम केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहत आलो आहोत. साहेबांनी मला देखील खूप मदत केली,माझ्या दोन्ही मुलांना साहेबांमुळे नोकरी मिळाली आणि आमचे जीवनच पालटले.साहेब शिक्षण मंत्री असताना एकदा सहज त्यांना भेटायला मुंबईला गेलो होतो. साहेबांनी विचारले शिक्षण संस्था सुरू करता का? मी म्हणालो, साहेब मला कसं जमणार? काहीच समजत नाही यातील. साहेब म्हणाले, काळजी करू नका मी आहे.गावातच शाळा झाल्याने ग्रामीण भागातील मुलांना शिकण्याची चांगली संधी मिळेल म्हणून न मागता साहेबांनी मला शिक्षण संस्था मंजूर करून दिली.आमच्या गावातील व परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण यामुळे मिळू लागले यावरून लक्षात येते की, साहेबांची दुरदृष्टी कमालीची होती व मन आभाळा एवढे मोठे होते.

    साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदा जोडजवळा येथे एका कार्यक्रमासाठी जाणार होते.
    भोईसमुद्रगा येथील ग्रामस्थांकडून सत्कार करायचा आहे.यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती त्यांना आम्ही केली.तेव्हा वेळात वेळ काढून काही मिनिटे आमच्या गावात ते थांबले, सर्वांशी आत्मीयतेने बोलून आमचा सत्कार स्वीकारला. साहेबांनी आमच्या गावासाठी नेहमी भरघोस निधी दिला.साहेबांनी केलेला विकास व आम्हासारख्या सामान्य लोकांना केलेली मदत कधीच विसरू शकत नाही. आज देखील साहेबांची आठवण आली की मन भरून येतं.
    - श्री बाबुराव बाबासाहेब देशमुख,भोईसमुद्रगा ता.जि लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 253 Jul 09, 2023
     
    साहेबांनी नेहमी कृतज्ञता जोपासली...
    माझे वडील कै. साहेबराव(दादा) चंद्रभान देशमुख यांचा साहेबां सोबतचा परिचय १९७४ पासूनचा, त्यावेळी साहेब बाभळगावचे सरपंच तथा लातूर पंचायत समितीचे उपसभापती व आमचे वडील गोंदेगावचे सरपंच होते.
    तसा साहेबांचा स्वभाव हा अगदी सुरवातीच्या काळापासूनच मनमिळाऊ,मितभाषी होता. साहेबांचे मित्र कै.बब्रुवान काळे यांच्याकडे राजदूत होती, त्यांच्या गाडीवर बसून साहेब नेहमी लातूरच्या ग्रामीण भागात फिरायचे. आमचे वडील वारकरी संप्रदायाला मानणारे होते. पंचायत समितीत साहेबांशी व मित्र परिवाराशी गप्पा मारत असताना ग्रामीण भागातील विविध अडचणी विषयी जाणून घ्यायचे.१९७६ साली बी.व्‍ही. काळे, शहाजीराव मुळे व अन्‍य मित्र मंडळीना सोबतच साहेबांना देखील शेतामध्ये स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिले होते.उन्हाळी दिवसात स्नेहभोजन आयोजित केल्यामुळे पावसाची शक्यता नव्हती,मात्र अचानक वातावरणात बदल झाला व अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या परंतु अशा परस्थितीत ही साहेबानी राजदूत गाडीवर प्रवास करून आमंत्रनास हजेरी लावली व येण्याबद्दलचा शब्द पाळला आणी मिश्किलपणे म्हणाले “माळकरी आलो की नाही तुमच्या मेजवानीला”.

    आपल्या गावाकडची, लातूरची माणसे म्हंटली की साहेब मुंबईत कितीही कामात व्यस्त असले तरी ही त्यांना आवर्जून भेटायचे,वेळ द्यायचे. माझ्या वडिलांना (दादांना) १९८३ साली कॅन्सर डीटेकट झाला व त्यांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटल, ताडदेव रोड, मुंबई येथे उपचारासाठी भरती करण्यात आले, उपचार झाल्यानंतर गावाकडील मंडळी दादांना गावाकडे परत नेण्यासाठी मुंबईला आली. परंतु सुट्टी होण्यासाठी दोन दिवस बाकी होती, त्यामुळे गावाकडील मंडळी साहेबांना त्यांच्या मुंबईच्या घरी भेटण्यास गेली. त्यावेळी दादाना कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबई येथे आणल्याचे साहेबांना कळताच त्यांनी सदरील डॉक्टरांना त्वरित संपर्क केला व उपचाराबद्दल सविस्तर माहिती घेऊन योग्य ती काळजी घेण्यास सांगितली, तसेच गावाकडील मंडळीना एका पोलीस उप निरीक्षकासह चारचाकीची उपलब्धता करून पुढची सोय केली.
    साहेबांसोबतच्या अशा असंख्य आठवणी सोबत आहेत. साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते ते पक्के राजकारणी कधीच नव्हते.आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं.आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे समाजाच्या सगळ्या थरांमधून असंख्य मित्र आणि अनुयायी त्यांच्याशी जोडले गेले.
     
    - श्री.बळवंतराव साहेबराव देशमुख
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 252 Jul 02, 2023
     
    तेंव्‍हा,साहेबांनी आमची प्रशंसा केली होती...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी त्‍यांच्‍या जिवनात सर्वसामांन्‍य व्‍यक्‍ती हा केंद्रभागी ठेऊन वाटचाल केली. स्‍वत: तरुणपणी गावपातळीवरील राजकारणात सक्रीय होऊन विविध पदे त्यांनी भुषविली आहेत. त्‍यामुळे ग्रामीण भागाच्‍या अडचणी त्‍यांनी जवळून पाहिल्‍या होत्‍या म्‍हणूनच १९८० साली आमदार झाल्‍यानंतर त्‍यांनी जनतेच्‍या प्रश्‍नांना सोडवण्‍यासाठी प्राधांन्‍य दिले. गावा-गावात पाण्‍याची योजना पोहोचवून नागरिकांना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून दिले. या सोबतच शेतक-यांच्‍या कष्‍टाला न्‍याय मिळावा यासाठी हक्‍काचा मांजरा साखर कारखाना उभा केला. या सर्व गोष्‍टीचा मी साक्षीदार आहे. साहेबांच्‍या पहिल्‍या निवडणुकीत आम्‍ही सक्रीयपणे सहभाग नोंदवून त्‍यांच्‍या विजयासाठी प्रयत्‍न केले आहेत. त्‍या काळी फार सोयी-सुविधा नव्‍हत्‍या,जेवढ्या अत्‍ता आहेत. तेंव्‍हाचा प्रचार म्‍हणजे घरो-घरी जावून नागरिकांच्‍या भेटी घ्‍यायच्‍या असा तो काळ होता. प्रत्‍येक कार्यकर्ता जिवाचं रान करून साहेबांसाठी कष्‍ट करायचा.
    या दरम्‍यान साहेबांनी कार्यकर्त्‍यांची खूप काळजी घेतली. प्रचारा दरम्‍यान प्रत्‍येकाच्‍या जेवणाची सोय ठिक-ठिकाणी त्‍यांनी करून दिली होती,त्‍यावेळी फारसे हॉटेल नव्‍हते. साहेब देखील कार्यकर्त्‍यांच्‍या घरी जेवायला जायचे. आम्‍हा सर्व कार्यकर्त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश मिळाले व साहेब आमदार झाले. विधानभवन मुंबईला जाण्‍यासाठी कुर्डूवाडीवरून रेल्‍वे निघायची.कुर्डवाडी पर्यंत साहेब बसने प्रवास करायचे. अनेकदा लातूर बसस्‍थानकात साहेबांना सोडण्‍यासाठी आम्‍ही जायचो. तळागाळातील जनतेसाठी राबणारा आमचा नेता राज्‍याचा मुख्‍यमंत्री झाला हे पाहण्‍याचे भाग्‍य आम्‍हाला लाभले.
    अनेकदा गावाच्‍या अडचणी सांगण्‍यासाठी आम्‍ही मंत्रालयात गेलो. तेंव्‍हा कधीही त्‍यांनी कोणत्‍याही कामास नाही म्‍हटले नाही. गुजरात भुकंप झाला तेंव्‍हा खूप मोठे नुकसान तेथील जनतेचे झाले होते. त्‍यावेळी जनतेला आधार देण्‍यासाठी कवठ्याचे विनायकराव पाटील यांच्‍या समवेत स्‍वयंसेवक म्‍हणून साहेबांनी मला पाठवले होते. प्राप्‍त सुचनांप्रमाणे आम्‍ही तेथे काम केले. त्‍यानंतर जेंव्‍हा साहेबांना आम्‍ही आमच्‍या कामाबद्दल सांगितले. तेंव्‍हा Very Good असं म्‍हणत त्‍यांनी आमची प्रशंसा केली होती. तो क्षण मी जिवनात कधीही विसरू शकत नाही. माझी आई आजारी असून तिला कॅन्‍सर झाला आहे. असं जेंव्‍हा साहेबांना समजलं तेंव्‍हा त्‍यांनी तात्‍काळ मला आर्थिक मदत मिळवून दिली होती. साहेबांनी माझ्या सारख्‍या असंख्‍य लोकांना अडचणीच्‍या काळात मदत केली होती. म्‍हणूनच आज देखील त्‍यांची आठवण काढली जाते
    - श्री.दत्‍तु भानुदास वंगवाड, उपसरपंच, महमदापूर, ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 251 Jun 25, 2023
     
    साहेब म्हणाले,तुमच्या शिष्याच्या घरी अगोदर जावू...
    माझे महाविद्यालयीन जीवन लातूर मधील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात झाले.तेंव्हा प्राचार्य म्हणून कडगे अप्पा काम पाहत होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात गावोगावी शिबिरे आयोजित केली जायची.
    युवक-युवतींचा सक्रिय सहभाग या शिबिरात मोठ्या प्रमाणात असायचा. लोकनेते विलासराव देशमुख साहेब तेव्हा नुकतेच आमदार झाले होते.त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे साहेबांनी आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपस यावे अशी विनंती प्रा.बी.व्ही.मोतीपवळे सर यांच्यामार्फत मी केली. ठरल्याप्रमाणे साहेब आमच्या गावी कार्यक्रमास आले.यावेळी प्रभावी पद्धतीने त्यांनी भाषण करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रम संपल्यानंतर कडगे सर व बी.व्ही.मोतीपवळे सरांकडे मी गेलो.साहेब चहा घेण्यासाठी माझ्या घरी येतील का?असं मी त्यांना म्हणालो. मी त्यांचा आवडता विद्यार्थी असल्याने मला साहेबांकडे ते घेऊन गेले. साहेबांना माझी विनंती सांगितली साहेब म्हणाले,ठीक आहे.अगोदर तुमच्या शिष्याच्या घरी येतो व नंतर इतर ठिकाणी जाऊ,असं म्हणता क्षणी मी खूप आनंदी झालो. साहेब स्वतः माझ्या घरी आले,माझा पाहुणचार स्वीकारला ही माझ्यासाठी लाखमोलाची गोष्ट होती.मी तेव्हापासून साहेबांचा चाहता झालो. साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी मी आवर्जून घराघरात जाऊन साहेबांच्या विजयासाठी प्रयत्न करायचो. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना त्या पदावर बसलेले पाहण्यासाठी मी मुंबईला जाण्याचं ठरवलं. परभणी- औरंगाबाद- इगतपुरी मार्गे रेल्वेतून प्रवास करत साहेबांचेऑफिस गाठले.
    साहेब काही कारणाने भेटणार नाहीत असे समजले. मी खुप निराश झालो.काय करावे कळेना एवढ्या लांबून येवून देखील साहेबांना भेटता येत नाही याचे वाईट वाटले.तरी मी हिंमत सोडली नाही.सुरक्षा अधिकाऱ्याकडे माझ्या नावाची चिठ्ठी दिली व ही चिठ्ठी साहेबांना द्या असा मी म्हणालो,सुरक्षा अधिकारी काही ऐकेनात साहेबांना भेटायचे असेल तर उद्या या असं ते म्हणाले.माझं मुंबईत कोणीच नाही.केवळ साहेबांना मी भेटायला आलोय असं मी त्यांना सांगितलं,सुरक्षा अधिकाऱ्यांना हे खरे वाटेना परंतू तरी देखील त्यांनी माझ्या नावाची चिठ्ठी साहेबांकडे पाठवली. साहेबांनी लागलीच मला आत बोलावून घेतले. साहेब मला म्हणाले, काय काम काढलं, मी म्हणालो, काही नाही साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेलं पहायची इच्छा होती. म्हणून मी आलो.पी ए ना सांगून साहेबांनी माझ्या जेवणाची व परत जाण्याची सोय करून दिली. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही.
    - श्री बाबुराव राजाराम आगवाणे चिंचोलीराव ता.जी.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 250 Jun 18, 2023
     
    विलासरावजी म्हणाले, पदावर नसलो तरी प्रश्न मार्गी लावणार...
    लातूरमध्ये दहावी झाल्यानंतर अकरावी,बारावीच्या शिक्षणासाठी राज्यातून विद्यार्थी येत असत, त्यामुळे स्थानिक गुणवंतांना नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास अडचण येत असे.लातूरची गुणवत्ता लातूरकरांचाच गळा घोटते आहे या मथळ्याखाली मी लोकसत्तेत लेख लिहिला होता त्यानंतर मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात आले होते. कार्यक्रमानंतर चहापानाच्या वेळी स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विषय निघाला तेंव्हा नणंदकर तुम्ही सांगा त्याप्रमाणे निर्णय करू, त्यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा असाव्यात व बाहेरच्या विद्यार्थ्यांना ३० टक्के जागा असाव्यात असे मी सुचवले. विलासरावांनी लगेच सांगितले असाच निर्णय होईल व पुढच्या वर्षी या पद्धतीने प्रवेश होतील. मात्र वर्ष उलटला तरी असा निर्णय झाला नाही त्यामुळे मी पुन्हा विलासराव देशमुख यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा लेख लिहिला.त्यादिवशी पाटील प्लाझा येथे भारत सातपुते यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते कार्यक्रमानंतर माझी भेट झाली व ते म्हणाले अरे आठवण तरी करुन द्यायची,मी आज वाचले. मुख्यमंत्री नसलो तरी हा निर्णय होणार म्हणजे होणार हे तुम्हाला सांगतो. त्यांनी पाठपुरावा करून लातूरकरांसाठीचा हा विषय संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला व स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे सुखकर झाले. काय वाट्टेल ते झाले तरी जनतेला दिलेला शब्द पाळायचा हा त्यांचा स्वभाव होता. याबाबतीत त्यांनी शेवटपर्यंत तडजोड केली नाही. त्यांच्या सोबतच्या आठवणींचा खजिना आहे .एक नाही अनेक उदाहरणे आहेत व ते आयुष्यभर लक्षात राहतील असे आहेत. लातूरची मंडळी भेटली की नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत? हे समजून घेऊन त्या त्वरेने मार्गी लागतील, लातूरच्या माणसाची कामे लवकर व्हायला हवीत हे ते प्राधान्याने ठरवत असत. तळे राखी तो पाणी चाखी या पद्धतीने लातूरकरांना पहिले प्राधान्य दिले पाहिजे हे त्यांनी मनोमन ठरवले होते व आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी हे निग्रहपुर्वक पाळले.
    - श्री.प्रदीप नणंदकर, पत्रकार,लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 249 Jun 11, 2023
     
    साहेब सर्वांना आपलेसे वाटायचे...
    राज्‍य आणि देशपातळीवर लातूर जिल्‍ह्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकसनशील जिल्‍हा अशी प्रतिमा सर्व देशभरात आपली राहीली आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख,माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्‍यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर या नेत्‍यांनी आपल्‍या कार्यातून समाजकारण व राजकारणात वेगळी ओळख निर्माण करून लातूरचा लौकीक वाढवला आहे.

    आम्‍ही निलंगा तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आहोत. सातत्‍याने पक्षवाढीसाठी प्रयत्‍न करत आलो आहोत. लोकनेते विलासरावजी देशमुख मंत्री, मुख्‍यमंत्री असताना त्‍यांनी आम्‍हा कार्यकर्त्‍यांना नेहमी मान-सन्‍मान दिला. प्रत्‍येक कार्यकर्त्‍यास साहेब नावाने ओळखायचे. कार्यकर्त्‍यांच्‍या काय अडचणी आहेत याची जाणीव त्‍यांना होती. कोणत्‍याही कामासाठी कुठलाही कार्यकर्ता साहेबांकडे आला तर हमखास त्‍याचे काम साहेब करत असत. असच एकदा आमच्‍या निलंग्‍यातील कुमार पाटील व मी मुंबई येथे मंत्रालयात साहेबांना भेटायला गेलो. साहजीकच तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. साहेब जेंव्‍हा त्‍यांच्‍या ऑफीसमध्‍ये जायला निघाले तेंव्‍हा आम्‍हाला पाहून म्‍हणाले, काय निलंगेकर काय काम काढलं. असं म्‍हणत ऑफीसमध्‍ये गेल्‍यावर त्‍यांनी आम्‍हाला आत बोलावून घेतले. आमची अडचण जाणून घेतली व ती अडचण सोडवण्‍यास सर्वतोपरी मदत त्‍यांनी केली. तेवढ्या गर्दीत साहेब आम्‍हाला बोलले हे पाहून तेथील अन्‍य लोक चकीत झाले. आवर्जून आमच्‍या जवळ आले व तुम्‍ही कुठल्‍या गावचे असे त्‍यांनी विचारले. साहेबांच्‍या स्‍वभावातील एक वैशिष्‍ट्य असे होते की, आपल्‍या लोकांची चार-चाघात किंमत कशी वाढेल हे पहायचे. अशी असंख्‍य उदाहरणे आपण एैकत आलो आहोत. लातूर जिल्‍ह्याच्‍या रौप्‍य महोत्‍सव कार्यक्रमा दरम्‍यान साहेबांची मन मोकळेपणानी भेट झाली. असंख्‍य जुन्‍या आठवणींना त्‍यांनी उजाळा दिला.
    कितीही मोठे संकट आले आणि कितीही अडचणी जिवनात आल्‍या तरी खचून जायचे नाही. हे साहेबांनी आपल्‍याला दाखवून दिले आहे. साहेब जेंव्‍हा पराभूत झाले तेंव्‍हा नाराज न होता जनतेच्‍या सुख दु:खात सामील होत गेले. जनतेच्‍या अडचणी सोडवत गेले. साहेबांनी कधीही जनतेची असलेली नाळ तुटू दिली नाही. म्‍हणूनच ज्‍या जनतेनी साहेबांना पराभूत केलं त्‍याच जनतेनी पुन्‍हा प्रचंड मतांनी निवडून देऊन साहेबांना थेट मुख्‍यमंत्री पदापर्यंत पोहोंचवलं. साहेब आम्‍हा सारख्‍या सर्व सामांन्‍य लोकांना आपले वाटायचे. म्‍हणूनच सदैव त्‍यांच्‍याप्रती आत्‍मीयता व श्रध्‍दा कायम आहे.
    - श्री.बालाजी रामचंद्र गोमसाळे, जाजनुर, ता. निलंगा, जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 248 Jun 04, 2023
     
    वाद-विवाद स्‍पर्धेसाठी साहेब आवर्जून आले होते...
    लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी माझ्या सारख्‍या असंख्‍य कार्यकर्त्‍यांना वेळो-वेळी प्रोत्‍साहन देऊन राजकारणात पुढे जाण्‍याची संधी दिली. लहानपणापासूनच कॉंग्रेस पक्ष व साहेबांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर व प्रेम होते. आमच्‍या भागात जेंव्‍हा- केंव्‍हा साहेबांचा कार्यक्रम असायचा तेंव्‍हा आमच्‍या गावात रिक्षातून सर्वांना सुचीत केले जायचे. अनेकदा त्‍या रिक्षात बसून साहेबांच्‍या कार्यक्रमास येण्‍याचे आवाहन माईकवरून करायचो. डीफार्मसीचे शिक्षण घेत असताना आमच्‍या गावात कै. नरसिंगराव चव्‍हाण स्‍मृती वाद-विवाद स्‍पर्धा आयोजित केली होती. याचे उद्घाटन कार्यक्रमास यावे अशी विनंती करण्‍यासाठी बाभळगावला गेलो असताना आवर्जून मी कार्यक्रमास येईल असा शब्‍द दिला व शब्‍द दिल्‍याप्रमाणे साहेब आले देखील. वाद-विवाद स्‍पर्धा उद्घाटनातील त्‍यांचे भाषण हे खुमासदार होते. त्‍या भाषणामुळे आम्‍ही सारे खूप प्रभावीत झालो होतो.
    साहेबांनी नेहमीच मला मोठेपणा दिला. कुठल्‍याही ठिकाणी, कितीही गर्दीत ते मला आवर्जून बोलायचे. काय म्‍हणतं नळेगाव असं म्‍हणून चार-चौघात माझ महत्‍व वाढवायचे. त्‍यामुळे साहजिकच अनेक अधिकारी मला ओळखू लागले व गावातील लोककल्‍याणाची कामे सहजपणे व्‍हायची. माझ्या भाऊजींचा गणपतीपुळे येथे पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला होता. मृतदेह मिळत नव्‍हता म्‍हणून मी साहेबांना फोन लावला. लागलीच साहेबांनी तेथील जिल्‍हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना फोन करून मदत मिळवून दिली. हेलीकॉप्‍टरव्‍दारे शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला होता. अशा संकटाच्‍या काळी साहेबांनी केलेली मदत आम्‍ही कधीही विसरूच शकत नाहीत.
    - श्री.अनिल विश्‍वनाथराव चव्‍हाण,माजी प.स.सदस्‍य, नळेगाव ता.चाकूर जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 247 May 28, 2023
     
    साहेबांनी माझ्या विनंतीला मान दिला...
    मी व माझा परिवार पूर्वीपासूनच कॉंग्रेस पक्षाच्‍या विचाराचे राहीलो आहोत. ग्रामीण भागातील विकासाला चालना देत असताना विविध विकासाच्‍या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोंचवून जनतेच्‍या मुलभूत गरजा साहेबांनी पूर्ण केल्‍या होत्‍या. आमच्या गावातील पाणी प्रश्‍न कायमचा सोडवण्‍यासाठी त्‍या काळात १२ लाख रू. साहेबांनी मंजूर करून दिले होते. पाणी पुरवठा योजनेच्‍या शुभारंभासाठी साहेब स्‍वत: आमच्‍या गावात आले होते. तेंव्‍हा मोठ्या उत्‍साहात गावातील लोकांनी साहेबांचे स्‍वागत केले होते. पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झाल्‍यानंतर साहेबांनी माझ्या घरी चहासाठी यावे अशी माझी इच्‍छा होती. परंतू साहेब येतील की नाही याचा विचार करून मी थोडं दबक्‍या आवाजात साहेबांना माझ्या घरी चहासाठी येण्‍याची विनंती केली. तेंव्‍हा त्‍यांनी तात्‍काळ होकार दिला आणि माझ्या घरी चहासाठी ते आले. घरात साध्‍या कपात त्‍यांनी चहा पिला. त्‍यामानानं घर छोट होतं तरी साहेबांनी माझ्या सारख्‍या कार्यकर्त्‍याच्‍या विनंतीला मान देऊन मनाचा मोठेपणा दाखवला होता.

    लातूर विधानसभेची निवडणूक सुरू असताना विविध प्रभागात साहेबांची प्रचार फेरी सुरू होती. एका प्रभागात साहेब माझ्या नजरेस पडले तेंव्‍हा जवळच फुलाच्‍या दुकानातून एक हार घेतला व साहेबांकडे गेलो. मला पाहताच साहेब म्‍हणाले, अरे तुम्‍ही इकडे कुठे ? गावाकडं प्रचार कसा सुरू आहे. असं म्‍हणत तेवढ्या गर्दीत माझा सत्‍कार स्विकारला. एकदा असंच बाभळगाव येथे आमचे सरपंच छगन आहीरे यांच्‍या समवेत वेळ आमवस्‍ये निमित्‍त गेलो होतो. मी ऐंकूण होतो की, साहेब वेळ आमवस्‍येला त्‍यांच्‍या शेतात खूप निवांत असतात. म्‍हणून मी साहेबांना भेटीसाठी गेलो. तेंव्‍हा खरच साहेब खूप निवांतपणे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्‍याशी गप्‍पा मारत असल्‍याचे मला दिसले. गप्‍पा झाल्‍यानंतर आवर्जून सर्वांना त्‍यांनी सोबत जेवणासाठी घेऊन गेले. तो क्षण माझ्या जिवनातील खूप सुखद क्षण होता. कायम गर्दीत वावरणारे साहेब तेंव्हा मला देखील मनसोक्‍त बोलले. विलासराव देशमुख साहेबांसारख्‍या मोठ्या व्‍यक्‍तीमत्‍वाचे नेते मला जवळून पाहता आले. याचे नेहमी समाधान वाटते.
    - श्री.भागवत इराप्‍पा कल्‍याणी, बावची,ता.रेणापूर जि.लातूर
    Share 1000 Views Read more
Load more

धिरज विलासराव देशमुख

आमदार , महाराष्ट्र विधानसभा , लातूर (ग्रामीण), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

निवास : मु. पोस्ट बाभळगाव, ता. जि. लातूर – महाराष्ट्र
संपर्क कार्यालय : B-44, एकमत भवन, लातूर - 413531, महाराष्ट्र

कॉल करा:  +91 9023599999

ई- मेल पाठवा:  connect@dhirajvilasraodeshmukh.com

सेवेची अट | गोपनीयता धोरण
कॉपीराइट  © २०२२ धिरज विलासराव देशमुख. सर्व हक्क राखीव
रचनाकार नेटिझन्स आय.टी.ई.एस.