• मुख्य पृष्ठ
  • माझ्याविषयी
  • लोकनेते
  • लातूर ग्रामीण
  • मीडिया
  • पुढाकार
    • रुग्णालयांची यादी
  • महत्त्वपूर्ण दुवे
  • संपर्क
    • माझ्याशी जोडले जा
    • अर्ज नोंदवा
    • अर्ज शोधा
    • संवाद साधा
...
अधिक माहिती

लोकनेते

  1. मुख्य पृष्ठ
  2. लोकनेते

Aug 31, 2017
The Prime Minister, Dr. Manmohan Singh, Chief Minister of Maharashtra, Shri Vilasrao Deshmukh alongwith other dignitaries are arriving at a function for the dedication of two rectors to the Nation at Tarapur Atomic Power Plant in Tarapur, Maharashtra on August 31, 2007.

Jun 28, 2012
The Union Minister for Science and Technology and Earth Sciences, Shri Vilasrao Deshmukh assumes the additional charge of the Union Minister for Micro, Small and Medium Enterprises, in New Delhi on June 28, 2012

Jun 21, 2012
Vilasrao Deshmukh addressing the first RIMES (Regional Integrated Multi-Hazard Early Warning System for Africa and Asia (RIMES) Ministerial Conference, in New Delhi. The Minister of State for Planning

Jun 21, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences, Dr. Ashwani Kumar with the MinistersAmbassadors of RIMES Members

May 15, 2012
Vilasrao Deshmukh at the releasing of the Book "A Global Parliament", in New Delhi on May 16, 2012.

May 11, 2012
A.P.J. Abdul Kalam launching the Global Innovation & Technology Alliance, at the celebration of the Technology Day 2012, in New Delhi. The Union Minister for Science and Technology and Earth Sciences

May 08, 2012
Vilasrao Deshmukh addressing the media on India US Partnering for Innovative Solutions, in New Delhi on May 08, 2012. The US Secretary of State, Ms. Hillary Clinton is also seen

May 07, 2012
Vilasrao Deshmukh with the Minister of Health, Welfare and Sports, Netherlands, Ms. Edith Schippers, at the delegation level meeting, in New Delhi

Apr 27, 2012
The Union Minister for Science and Technology and Earth Sciences and Vice President, CSIR, Shri Vilasrao Deshmukh addressing the media on the occasion of the CSIR Leadership Conference, at IMT Chandigarh. The DG, CSIR

Apr 26, 2012
Vilasrao Deshmukh addressing the press conference on the First Stage Long Range Forecast (LRF) for 2012 South-West Monsoon rainfall, in New Delhi. The Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences

Apr 24, 2012
Ghulam Nabi Azad launching the new Anti Malaria Drug on World Malaria Day, in New Delhi. The Union Minister for Science and Technology and Earth Sciences, Shri Vilasrao Deshmukh, the Chairman, Ranbaxy Laboratories Ltd

Apr 20, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister for Universities and Science, Mr. David Willets, signing the protocol of 3rd meeting of India UK Science and Innovation Council, in London on April 20, 2012

Mar 30, 2012
Vilasrao Deshmukh flagging off the first test-run of a fully loaded TAVERA (a regular diesel vehicle) on neat (B100) “microalgal biodiesel”, in New Delhi. The Secretary, DSIR & DG CSIR

Mar 30, 2012
Vilasrao Deshmukh and the Minister of Science and Technology & Innovation of Brazil

Mar 02, 2012
Vilasrao Deshmukh, the Minister of State for Planning, Science & Technology and Earth Sciences

Load more
विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास - मा. उल्हासदादा पवार

विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास - मा. उल्हासदादा पवार

विलासराव देशमुख यांच्या आठवणी अण्णा हजारे यांच्या शब्दात

विलासराव देशमुख यांच्या आठवणी अण्णा हजारे यांच्या शब्दात

Ghe Bharari Official Song

Ghe Bharari Official Song

Hon. Vilasrao Deshmukh Speech

Hon. Vilasrao Deshmukh Speech

फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

फ्रेंडशीप डे विशेष : गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं संग्रहित भाषण

NDTV - In conversation with Shri. Vilasraoji Deshmukh

NDTV - In conversation with Shri. Vilasraoji Deshmukh

मा.खा . यशवंतरावजी गडाख साहेब लिखित सहवास पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे दिलखुलास मनोगत.

मा.खा . यशवंतरावजी गडाख साहेब लिखित सहवास पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे दिलखुलास मनोगत.

रमेशचंन्द्रजी कानडे यांचे

रमेशचंन्द्रजी कानडे यांचे 'विचार संहिता' या पुस्तक प्रकाशन सोहळ्या मधील साहेबांचे उत्तम भाषण

कै.नरुभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार,पुणे

कै.नरुभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार,पुणे ' या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब

Hon. Vilasraoji Deshmukh Interview on SAAM MARATHI

Hon. Vilasraoji Deshmukh Interview on SAAM MARATHI

मराठवाडा भूषण गौरव पुरस्कर सोहळा

मराठवाडा भूषण गौरव पुरस्कर सोहळा

मा. शरद पवार यांच्या बद्दल  - मा. विलासरावजी देशमुख यांचे हितगुज

मा. शरद पवार यांच्या बद्दल - मा. विलासरावजी देशमुख यांचे हितगुज

Speech by Shri Vilasrao Deshmukh at Khedut Shibir

Speech by Shri Vilasrao Deshmukh at Khedut Shibir

Load more
  • #आठवणीसाहेबांच्या 229 Jan 22, 2023
     
    साहेबांनी तेवढ्या व्‍यस्‍थतेत आमची काळजी घेतली....
    जवळपास १९८९ पासूनचा मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. साहेब आमच्यासाठी सर्वस्व होते.सर्व सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावे,कशी आपुलकी जोपासावी.हे साहेबांकडून शिकण्यासारखे आहे.मी तेंंव्हा सेवा दलात काम करायचो.

    अशोक अग्रवाल सेवा दलाचे अध्यक्ष होते.विमानतळावर स्वागतासाठी जाणे असेल किंवा कोणत्याही कार्यक्रमात तयारी करणे असेल ही कामे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडायचो. आमच्या प्रभागात हमखास साहेबांची प्रचार सभा व्हायची, त्या सभेची तयारी करण्यासाठी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन साहेबांच्या सेभेला यायचं निमंत्रण आम्ही नागरीकांना द्यायचो.
    कालिकादेवी मंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रभागातील ज्येष्ठ व्यक्तींनी माझ्या कामाविषयी साहेबांना सांगितले,तेंव्हा साहेबांनी मला जवळ बोलावून माझी पाठ थोपटली आणि शाबासकी दिली. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. साहेब म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा केंद्र होते. जेंव्हा,केंव्हा साहेबांशी भेट व्हायची.
    तेंव्हा प्रचंड उत्साह आमच्यात संचारला जायचा. एवढ्या प्रेमाने व आपुलकीने साहेब आमच्याशी वागायचे.दुर्दैवाने ९५ साली साहेबांचा पराभव झाला.मात्र तरी देखील ते खचले नाहीत.आम्हाला म्हणाले,हार जीत तो होती रहती है, चिंता मत करो ९९ च्या निवडणुकीनंतर जेंव्हा मुख्यमंत्री पदाची निवड सुरू झाली तेव्हा साहेबांचे नाव चर्चेत होते. त्या घडामोडी दरम्यान लक्ष्मणराव मोरे यांच्या समवेत मी देखील मुंबईला गेलो होतो. असंख्य कार्यकर्ते लातूर व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुंबईला आले होते.साहेब प्रचंड धावपळीत होते. अशावेळी साहेबांनी लक्ष्मण मोरे यांना सांगितले की, आपला कोणताही कार्यकर्ता उपाशी राहिला नाही पाहिजे. प्रत्येकाच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था लक्षपूर्वक करा, ही सूचना देताना मी तेथेच होतो. साहेब आपल्या लोकांची किती काळजी घेतात हे पाहून माझं मन भरून आलं,एवढ्या महान नेत्याचा आपण एक कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आज ही वाटतो.
    - श्री.रामभाऊ मारुती चिखले,माजी सरचिटणीस काँग्रेस कमिटी लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 228 Jan 15, 2023
     
    साहेबांनी केलेल्या कौतुकामुळे माझा उत्साह वाढला...
    लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे सर्वांसाठी प्रेरणादायी नेते होते.विशेषता: आम्हा युवकांना ते खूप प्रेरित करायचे. स्वतः युवक काँग्रेस मधून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. त्यामुळे युवकांच्या भावना ते चांगल्या प्रकारे ओळखायचे. मला शालेय जीवनापासूनच साहेबांविषयी प्रचंड आकर्षण होते.तसं पाहिले तर आमची एक पिढी साहेबांना पाहतच मोठी झाली म्हणून साहेब आम्हाला खूप आवडायचे. गावात साहेब येणार आहेत हे समजल्यावर एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळायचे. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना त्र्यंबक नाना भिसे व रेणापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांच्या समवेत अनेकदा मी साहेबांना भेटायला बाभळगावला जायचो. माझा फारसा परिचय जरी नसला तरी,साहेब हसतमुखाने माझ्याशी बोलायचे, युवक काँग्रेसच्या कामाची माहिती घ्यायचे व योग्य त्या सूचना देखील करायचे. साहेबांना भेटून परत जातेवेळी एक प्रकारचा उत्साह माझा मध्ये संचारला जायचा व नव्या जोमाने आम्ही कामाला लागायचो.

    2009 साली मांजरा साखर कारखाना येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी.याची चाचपणी करण्यासाठी साहेबांनी सर्व गावातील लोकांना बैठकीस बोलवले होते.

    आमच्या गावातील मंडळींसोबत मी देखील त्या बैठकीस गेलो होतो.पुढून दुसऱ्या रांगेत मी बसलो होतो. समोर साहेब व उपस्थितांमध्ये मी सर्वात लहान यामुळे आपण बोलावं की नाही हा विचार करत असताना दोन-तीन वेळेस माईक घेण्याचा प्रयत्न केला, त्या बैठकीत बोलण्यासाठी माझी धडपड साहेब पाहत होते. अशावेळी साहेबांनी युवकांचं काय मत आहे?हे जाणून घेऊयात असं म्हणत माईक मला देण्याच्या सूचना केल्या. मी हिंमत करून उठलो व लातूर ग्रामीण मधून दिलीपरावजी देशमुख साहेबांना उमेदवारी देणे कसे योग्य आहे हे ज्या पद्धतीने मी सांगितले हे पाहून साहेबांनी आवर्जून माझे कौतुक केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला. साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी सक्रिय राजकारणात काम करू लागलो व लोकनियुक्त सरपंच झालो. आज देखील साहेबांनी दाखवलेल्या विचाराच्या वाटेवर मी चालतोय.
    - श्री.रामहरी मधुकरराव गोरे, भोकरंबा ता.रेणापूर जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 227 Jan 08, 2023
     
    साहेब म्‍हणाले, मी आहे पाठीशी...
    #लोकनेते विलासराव देशमुख #साहेब आमच्‍यासाठी सर्वस्‍व होते. #ग्रामीण भागातील कार्यकर्त्‍यांना नेहमीच त्‍यांनी बळ दिले. कार्यकर्त्‍यांच्‍या अडी-अडचणी समजून घेऊन त्‍या सोडवण्‍यासाठी त्‍यांनी नेहमीच सहकार्य केले. साहेब मंत्री व मुख्‍यमंत्री जरी असले तरी आमच्‍या सोबत ते नेहमी प्रेमाने वागायचे. कधीही पदाचा त्‍यांनी बडेजावपणा केला नाही. साहेबांच्‍या पहिल्‍या निवडणुकीत केलेला प्रचार मला आज देखील आठवतो. त्‍यावेळी बी.व्‍ही.काळे साहेबांनी प्रचारासाठी आम्‍हाला जीप दिली होती. त्‍याकाळी जीप म्‍हणजे खूप मोठेपणा समजला जायचा. गावोगावी आम्‍ही प्रचार करत तेथील परस्‍थीतीचा आढावा घेत होतो व सायंकाळी साहेबांना तो आढावा सादर करून त्‍यानुसार प्रचारात नियोजन केले जात होते. एवढ्या बारकाईने व मोठ्या कष्‍टाने साहेबांनी विजय मिळवला होता. साहेबांना सुरूवातीच्‍या काळात विरोधकांकडून खूप त्रास दिला जायचा. मात्र ते कधीही डगमगले नाहीत. एकदा आमच्‍या भागात साहेबांची प्रचार सभा होती. #निवडणुक अटी-तटीची होती. साहेब स्‍वत: सभेला येणार असल्‍याने विरोधकांना धास्‍ती लागली होती. आम्‍हाला कळून चुकले होते की, साहेबांच्‍या सभेत विरोधक काहीतरी अडचण आणणार आणि नेमकं सभा सुरू होण्‍यापूर्वी साहेबांची जेथे सभा होणार होती त्‍यापासून थोड्या अंतरावरच एका घरावर मोठ्या आवाजात त्‍यांनी माईकवर गाणे सुरू केले. वातावरण तणावाचे होणार होते. साहेब एका कार्यकर्त्‍याच्‍या घरी चहासाठी थांबले होते. साहेबांना ही गोष्‍ट समजली. मी तेथेच होतो. साहेब म्‍हणाले, त्‍यांना जे करायचे आहे ते करू द्या. तुम्‍ही शांत रहा. एवढ्यात मी बाहेर आलो. साहेबांनी ओळखले की मी काहीतरी करणार. तेथून मी सभेच्‍या ठिकाणी आलो. योगा-योगाने गावात दोन डीपी होत्‍या. ज्‍या डीपीवरून विरोधकांच्‍या माईकवर गाणे सुरू होते तो डीपीच बंद पाडला. साहेबांची सभा जोरदार झाली. सभा संपल्‍यानंतर साहेबांनी मला बोलावून घेतले आणि नेमकं काय केलात हे विचारले. घडला प्रकार साहेबांना सांगितला तेंव्‍हा साहेब हसले व म्‍हणाले, काळजी करू नका कोणी काही बोललं तर मला सांगा मी आहे तुमच्‍या पाठीशी. साहेबांसाठी आम्‍ही काहीही करण्‍यास तयार असायचो. त्‍याचं कारण साहेबांचा मनमिळाऊ स्‍वभाव होता.
    - श्री. रामचंद्र एकनाथ शिंदे, माजी सरपंच, टाका,ता.औसा जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 226 Jan 01, 2023
     
    विलासराव साहेब मला ओळखतात यातच मोठेपणा होता.
    विलासराव देशमुख साहेबांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकी पासूनचा मी एक कार्यकर्ता आहे.१९८० साली साहेब निवडणुकीला थांबत आहेत.हे जेंव्हा आम्हाला समजले,तेंव्हा आम्ही खूप आनंदित झालो होतो. निवडणूक म्हटलं की प्रचार तर आलाच.म्हणून आम्ही साहेबांच्या विजयासाठी कामाला लागलो, गावात कोण विरोधात आहे हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर होती. विरोधी लोकांची समजूत काढून विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन साहेब खूप आपुलकीने करायचे त्यामुळे अनेक विरोधक देखील साहेबांच्या प्रचारात आघाडी घ्यायचे हे मी पाहिला आहे. विरोधकांना देखील आपलंसं करण्याची त्यांची खासियत होती.

    साहेब आमदार म्हणून निवडून आले व त्यानंतर आपल्या भागाचा कसा कायापालट झाला हे आपण जाणतो. साहेबांना मी रोज उठून भेटायला जात नव्हतो मात्र तरी देखील साहेब मला नावाने ओळखायचे.एकदा नागपूर अधिवेशना दरम्यान मी व मोहनराव भिसे साहेबांना भेटण्यासाठी तेथे गेलो होतो. साहेब मुख्यमंत्री असल्याने साहजिकच खूप गर्दी होती. खासदार,आमदार देखील साहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होते. साहेब ऑफिस मधून बाहेर आले,आम्ही उजव्या बाजूस कोपऱ्यात थांबलो होतो.साहेबांनी मला पाहिले व म्हणाले,काय गंगणे बरे आहात का? तेव्हा सगळे माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागले, सोबत असलेले मोहनराव भिसे गावाकडे आल्यावर पक्षातील माझ्या मित्रांना सहज म्हणाले, गंगणेच्या नादी लागू नका साहेब त्यांना नावाने ओळखतात. खरंच,साहेब माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यास नावाने ओळखतात यातच माझा मोठेपणा होता.
    शेतीसोबतच मी गुत्तेदारी करत आलो आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार मला जाहीर झाला होता. योगा-योगाने साहेबांच्या हस्ते व पालकमंत्री आनंदराव देवकते यांच्या उपस्थितीत तो पुरस्कार मला मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी जेंव्हा मी व्यासपीठावर गेलो.तेव्हा साहेबांना मला पाहून आश्चर्य वाटले.अरे, तुम्ही इकडे पण? असं जेंव्हा मला साहेब म्हणाले, तेंव्हा मी म्हणालो, साहेब अगोदर शेती व नंतर गुत्तेदारी.यावर साहेब त्यांच्या खास अशा शैलीत स्मित हास्य करत हसले.त्यावेळी साहेबांनी माझा केलेला सत्कार मी कधीच विसरू शकत नाही.
    - श्री. मधुकर निवृत्ती गंगणे, सिंधगाव ता.रेणापुर जि. लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 225 Dec 25, 2022
     
    साहेबांमुळे पगार कपात वाचली...
    मी खूप सर्वसाधारण परिवारातला, मांजरा साखर कारखान्‍यात नौकरीस लागलो व त्‍याच कारखान्‍यात कार्यलक्षी संचालक म्‍हणून माझी निवड झाली ही किमया लोकनेते विलासराव देशमुख साहेबांची आहे. संचालक होण्‍यासाठी इतर ठिकाणी काय-काय करावं लागतं हे सर्वांनाच माहिती आहे.
    १९८४ साली स्‍व.बी.व्‍ही. काळे यांच्‍या शिफारशी वरून मी मांजरा कारखाना येथे नौकरीस लागलो. तेंव्‍हा कारखान्‍याचे ऑफीस छत्रपती शिवाजी महाराज चौकात होते. तेथेच कारखान्‍याची पहिली बैठक पार पडल्‍याचे आजही मला आठवते. तिथ पासूनच साहेबांच्‍या संपर्कात मी आलो. सुरूवातीचा तो काळ खूप संघर्षाचा होता. त्‍यावेळी सोई-सुविधा फार नव्‍हत्‍या. अनेकदा साहेब बसने प्रवास करायचे हे मी पाहिले आहे. रेल्वेने साहेब कुर्डूवाडी पर्यंत यायचे मग तिथे जीप घेऊन आम्‍ही साहेबांना घ्यायला जायचो. असंच एकदा कुर्डूवाडी जवळ पोहोंचलो असताना एका ठिकाणी चहासाठी ड्रायव्‍हर आणि मी थांबलो होतो. जीप पर्कींगमध्‍ये लावून हॉटेलात गेलो व तेथून परत आल्‍यानंतर मागच्‍या सीट कोणीतरी काढून नेल्‍या होत्‍या. आता काय करायचे कळत नव्‍हते. साहेब तर काही तासात येणार होते. ही चिंता मनात घेऊन आम्‍ही रेल्‍वे स्‍टेशनला गेलो. साहेब आले व त्‍यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेंव्‍हा साहेब म्‍हणाले, इथे टांगेवाले असल्‍याने कोणीतरी गाडीची सीट काढून नेली असेल त्‍यामुळे काळजी करू नका. एवढंच नाही तर लातूरला आल्‍यानंतर कारखान्‍याच्‍या कार्यकारी संचालकांना आमच्‍यावर काही कार्यवाही करू नये अशा सुचना केल्‍या. साहेबांनी सुचना केली नसती तर माझी पगार कपात झाली असती. असाच एक प्रसंग सुरूवातीच्‍या काळातला साहेब कुर्डूवाडी वरून लातूरला येत असताना वाटेतच गाडी खराब झाली. आम्‍ही काळजीत पडलो, तेंव्‍हा साहेब स्‍वत: म्‍हणाले मी बसने जातो. गाडी दुरूस्‍त करून घेऊन या व कुर्डूवाडी-उदगीर गाडीने ते लातूरला आले.एवढा सहज स्‍वभाव साहेबांचा होता. साहेबांमुळेच माझ्यासह अनेकांच्‍या जिवनात कायापालट झाल असून पिढी सुधारण्‍याचे काम त्‍यांनी केले.
    - श्री.मुरलीधर ज्‍योतीबा निकम, कासारजवळा ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 224 Dec 18, 2022
     
    साहेबांनी अपेक्षेपेक्षा जास्त निधी दिला होता...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी ग्रामीण भागाच्या विकासाला नेहमीच चालना दिली.ग्रामीण भागातील अर्थकारणाला डोळ्यासमोर ठेवून साखर कारखानदारी निर्माण केली व ती यशस्वीरित्या चालून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. याची असंख्य उदाहरणे ग्रामीण भागात पहावयास मिळतात.

    माझे वडील गंगाधर अंबेकर यांचे व साहेबांचे स्नेहाचे संबंध होते. माझे वडील १९९५ च्या दरम्यान गावचे उपसरपंच होते. साहेबांनी कधीही आमच्या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. अनेकदा त्यांनी न मागता देखील गावासाठी विकास निधी दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी आमचे गाव हे लातूर विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्हते,मात्र तरी देखील साहेबांनी आमच्या गावातील विकासासाठी मोलाची साथ दिली. साहेबांनी विकास कामात कधीच भेदभाव केला नाही. त्यांचे हे एक उदाहरण आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. साहेबांकडे पाहूनच मी तरुणपणापासून राजकारणात आलो.युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना अनेकदा कार्यक्रमानिमित्त साहेबांचे भाषण ऐकायला मिळाले.साहेबांचे भाषण ऐकून प्रेरणा मिळायची.साहेबांनी रेणापूर तालुका उपाध्यक्षपदी माजी निवड करून मला तालुकास्तरावर काम करण्याची संधी दिली. माझ्यासारख्या असंख्य युवक कार्यकर्त्यांना ते प्रोत्साहन द्यायचे. जनतेत जावा,त्यांची कामे करा असा संदेश ते नेहमी द्यायचे. त्यामुळे नेहमी आम्ही गावातील अडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी तत्पर असायचो. आमच्या गावातील रस्ता खराब झाला होता. तो दुरुस्त होणे खूप गरजेचे होते. संबंधित विभागाचे अधिकारी आम्हाला दाद देत नव्हते. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटत नव्हता. साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, साहेबांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु छोट्याशा रस्त्याच्या कामासाठी कसे जावे? असा संकोच मी करत होतो. मात्र तरी आम्ही साहेबांकडे गेलो, साहेबांनी आमच्या शिष्टमंडळास पाहून, काय काम काढले ? असे विचारले तेव्हा आम्हाला धीर आला. रस्त्याची अडचण सांगितली, लागलीच साहेबांनी अधिकाऱ्यास बोलावून रस्त्याच्या कामाबद्दल सूचना केल्या. विशेष म्हणजे त्या कामासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तीचा निधी त्यांनी आमच्या गावासाठी देऊन ग्रामस्थांची अडचण दूर केली. लहान मोठे कोणतेही काम असो साहेबांनी त्या कामासाठी कधीच नकार दिला नाही. अशा मोठ्या मनाचे साहेब होते.
    - श्री नारायण गंगाधर अंबेकर नरवटवाडी ता.रेणापुर जि. लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 223 Dec 11, 2022
     
    साहेबां सोबतचा मुंबई विमानतळावरचा तो क्षण....
    लोकनेते विलासराव देशमुख साहेबांमुळेच मी राजकारणात आलो व टिकलो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी नेहमीच प्रेमाची वागणूक दिली. म्हणूनच माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांसोबत राहिले.

    साहेबांमुळेच मी गावचा सरपंच व लातूर पंचायत समितीचा उपसभापती झालो.साहेबांचा पूर्वीपासूनचा मी एक कार्यकर्ता होतो. साहेब मंत्री असल्याने ते जेंव्हा शनिवार व रविवारी लातूरला यायचे तेव्हा आवर्जून मी साहेबांसोबत असायचो. त्याकाळी वाहनाची व्यवस्था नसायची म्हणून सकाळी घरातून पळशी फाट्यापर्यत चालत जायचो साधारण दीड तास लागायचे. तेथून एसटीमध्ये बसून लातूरला यायचो आणि मग साहेबांकडे जायचो. दिवसभर साहेबांसोबतचे कार्यक्रम आटोपून परत पळशी फाटा गाठायचो व तेथून चालत माझ्या गावापर्यंत यायचो,असा नित्यक्रम आमचा असायचा.

    साहेब मंत्री असताना ते परदेश दौऱ्यावर गेले होते.त्यावेळी बहुतेक ते प्रथमच परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला होता. तो आनंद साजरा करण्यासाठी बी.व्ही.काळे,नामदेवराव पाटील,धनंजय देशमुख, आबासाहेब पाटील,मोईज शेख व मी असे आम्ही सारे मुंबईला गेलो होतो. परदेशातून साहेब मुंबई विमानतळावर आल्यानंतर आम्ही त्यांचे स्वागत व सत्कार केला,तेंव्हा साहेबांनी देखील मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला.आम्हा सर्वांसोबत फोटो काढला.तो फोटो माझ्यसाठी खूप मोलाचा होता कारण साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. तो फोटो आजही मी खूप सांभाळून ठेवला आहे. विमानतळावरून घराकडे जात असताना आम्हा सर्वांची जेवणाची व्यवस्था साहेबांनी करून दिली होती. सर्वांनी जेवण करूनच जावे असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. एवढी काळजी घेणारा आमचा नेता होता.
    मी वारकरी संप्रदायास मानणारा आहे.मुशीराबाद येथे नामदेवराव पाटील यांनी साहेबां साठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. आम्ही एक कार्यक्रम आटोपून तेथे पोहोचलो. मी नॉनव्हेज खात नाही हे साहेबांनी लक्षात ठेवले होते. नामदेवराव पाटलांना साहेब म्हणाले आपल्यासोबत एक वारकरी आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली का? असं म्हणता क्षणी माझ्यासाठी विशेष असे साधे जेवण उपलब्ध करून दिले होते. आपल्या सोबतच्या लोकांची साहेब नेहमी काळजी घ्यायचे. जिल्ह्यात दुसरा क्रमांक आमच्या पंचायत समितीचा आल्याकारणाने साहेबांच्या हातून माझा सत्कार झाला होता तो सत्कार मी कधीच विसरू शकत नाही. साहेब आमच्यासाठी सर्वस्व होते त्यांना कधीच मी विसरू शकत नाही.
    - श्री. लालासाहेब राजाराम चव्हाण,रा.वाला ता.रेणापूर जि लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 222 Dec 04, 2022
     
    साहेबांनी मदत केली म्‍हणूनच सर्व व्‍यवस्‍थीत झालं...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेब नेहमी इतरांना मदतीसाठी तत्‍पर असायचे. मदत करताना कोण आपला, कोण परका याचा भेदभाव कधी केला नाही. त्‍यामुळेच देशभरात त्‍यांना माननारा मोठा वर्ग आहे. इतरांच्‍या अडचणीत मदत करून साहेबांनी नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला होता.
    माझ्या मामाचे घर विशालनगर भागात आहे. विशाल नगर भागात एका व्‍यक्‍तीचा खून झाला होता. मामाची मुलं त्‍या ठिकाणापासून काही अंतरावर मोबाईलवर खेळत होते. पोलीसांनी घटनास्‍थळी आजू बाजूला कोण होते याची तपासणी करत असताना तेथील टॉवरची माहिती घेतली असता मामांच्‍या मुलांचा नंबर त्‍यांच्या निदर्शनास आला. रात्री १२ वाजता पोलीसांनी मामांच्‍या मुलांना ताब्‍यात घेतले. वास्‍तवीक पाहता मामांच्‍या मुलांचा काहीही संबंध त्‍या घटनेशी नव्‍हता. घरामध्‍ये प्रचंड तणावाचे वातावरण होते. काय करावे असे वाटत असताना मला साहेबांची आठवण आली व मी साहेबांना फोन लावला. त्‍यांनी तो उचलला नाही. मग मी त्‍यांच्‍या पीए ना फोन लावला. साहेब दिल्‍ली विमानतळावर आहेत. त्‍यामुळे फोन उचलत नाहीत. मुंबईला पोहोंचल्‍यावर तुम्‍हाला संपर्क करून देतो असे त्‍यांनी सांगितले.रात्री १२.२० ची ती वेळ होती. त्‍यानंतर अवघ्या काही तासात साहेबांशी सपंर्क झाला. सर्व घटना व वस्‍तुस्‍थीती मी साहेबांना सांगितली. विनायकराव देशमुख तेंव्‍हा अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक होते. त्‍यांच्‍याशी मी संपर्क केला तेंव्‍हा मामांच्‍या मुलांना सोडून देण्‍यात आले. साहेबांनी तेंव्‍हा मदत केली नसती तर मामाच्‍या मुलांचे आयुष्‍य बर्बाद झाले असते. आज ती दोन मुलं अमेरिका व जर्मनी येथे स्‍थाईक असून साहेबांनी केलेल्‍या मदतीमुळे ते शक्‍य झाले. केंद्रात मंत्री असताना साहेब एकदा तावरजा डॅमकडे जात असताना आम्‍ही काही मंडळी स्‍वागतासाठी थांबलो. तेंव्हा साहेबांनी गाडी थांबवून आमचा सत्‍कार स्विकारला. त्‍यावेळी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात आमच्‍या भागात नुकसान झाल्याचे सांगितले. साहेबांनी पुढील १५ दिवसात आम्‍हाला सोयाबीनचे अनुदान मिळवून दिले होते. मांजरा कारखान्‍याच्‍या बाजूला नवीन वस्‍तीत लाईटची सुविधा नव्हती त्‍यामुळे नागरिकांना खूप अडचण होत होती. साहेब लातूर विमानतळावर आले असताना आम्‍ही ही अडचण सांगितली. तेंव्‍हा काही तासातच त्‍या नवीन वस्‍तीत लाईटचे पोल उभारले गेले होते. साहेबांच्‍या अशा अनेक आठवणी आहेत ज्‍या आज देखील सातत्‍याने आठवत असतात.
    - श्री. गुरूनाथ निवृत्‍ती गवळी, चिंचोलीराववाडी, ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 221 Nov 27, 2022
     
    आम्‍ही त्‍यावेळी खळं शिजवून साहेबांचे पोस्‍टर लावायचो...
    विलासराव देशमुख साहेबांचा मी एक कार्यकर्ता. १९८० ला जेंव्‍हा साहेब प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी थांबले तेंव्‍हा पासून मी साहेबांसाठी काम करत आलो आहे. त्‍यावेळी अनेकजण मला साहेबांचा सर्वात लहान कार्यकर्ता म्‍हणायचे. मी तेंव्‍हा १० वी मध्‍ये शिकत होतो. मला अजूनही ते दिवस आठवतात. साहेबांकडे एस.डी. गाडी होती. गाडीवर साहेब व बी.व्‍ही.काळे साहेब आमच्‍या गावात यायचे. १९८० च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी साहेबांनी गाडीवर सर्व गावांना भेटी देऊन एक राऊंड पूर्ण केला होता. उन्‍हाळ्याचे दिवसातील सुट्यांमध्‍ये मित्रांसोबत गोट्या खेळायचे सोडून मी साहेबांच्‍या मागे फिरायचो. तेंव्‍हा माझी तळमळ पाहून साहेबांनी माझं नाव व गाव लिहून घेतले होते. साहेबां सोबत तेंव्‍हा मोठे प्रस्‍तावीत कार्यकर्ते नव्‍हते. त्‍यांना साहेबांविषयी फारशी आस्‍था नसायची. आम्‍हा सारख्‍यावर सर्व सामांन्‍य लोकांना साहेबांनी जवळ केले होते. आम्‍हा सारख्‍यांनी साहेबांसाठी जिवाचं रान केले होते. साहेबांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली तेंव्‍हा आमचा आनंद गगनात मावत नव्‍हता. साहेबांच्‍या प्रचारासाठी आम्‍ही गावो-गाव फिरायचो. घरातील खळं शिजवून साहेबांचे पोस्‍टर आम्‍ही गावात लावायचो. साहेब तेंव्‍हा निवडून आले नंतर मंत्री देखील झाले. मात्र आम्‍हा सारख्‍या कार्यकर्त्‍यांना ते कधी विसरले नाहीत.
    आमच्‍या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मी उभा रहावे असं साहेब म्‍हणाले. मी म्‍हणालो साहेब मला नाही जमणार. माझयाकडे पैसे देखील नाहीत. तेंव्‍हा साहेबांनी ५०० रू.मला निवडणुकीसाठी दिले होते. साहेबांमुळे मी निवडून देखील आलो. तेंव्‍हा पासून ते आजपर्यंत म्‍हणजे जवळपास ४० वर्षापासून ग्रामपंचायत आमच्‍याकडे आहे. जनतेत जावं, जनतेची कामं करावीत असं नेहमी साहेब मला सांगायचे आणि मी तसंच केलं. म्‍हणूनच ४० वर्ष ग्रामपंचायत आमच्‍याकडे लोकांनी दिली. आमचं गाव कधीही साहेबांना लीड देण्‍यात पुढे राहीले आहे. साहेब मंत्री व मुख्‍यमंत्री असताना देखील खूप प्रेमाने व आपुलकीने त्‍यांनी मला वागवले. माझी शरीराची ठेवण ही पूर्वी पासूनच सडपातळ होती. साहेब मला नेहमी म्‍हणायचे कधीतरी अंगाला मास चढू द्या. असं हसत मुखाने संवाद साधायचे.
    साहेब व देशमुख परिवाराशी एक निष्‍ठ राहिलो म्‍हणूनच न मागता मला विलास साखर कारखान्‍याचे दोन वेळा संचालक पद मिळाले. हे मी माझे भाग्‍य समजतो.
    - श्री. भैरवनाथ रघुनाथ सवासे, (संचालक, विलास कारखाना) कासारजवळा ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 220 Nov 20, 2022
     
    साहेब राज्यपालांना म्हणाले, हे माझ्या लातूरचे शेतकरी आहेत
    तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी,शेतमजूर यांचा विकास झाला पाहिजे. उद्योगधंदे, साखर कारखानदारी वाढवून त्या माध्यमातून सर्वांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असलेले विलासरावजी देशमुख सर्वांना आपलेसे वाटायचे.

    जेंव्हा,केंव्हा ते हरंगुळ या गावी यायचे तेव्हा आवर्जून आमची भेट व्हायची. शेतात मी करत असलेल्या प्रयोगाचे ते नेहमी कौतुक करून मला प्रोत्साहन द्यायचे. साहेब मुख्यमंत्री असताना शासनाच्या वतीने मला पुरस्कार जाहीर झाला होता.त्या पुरस्काराचे वितरण राज्यपाल एस जमीर यांच्या हस्ते पार पडले. मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेलो, माझ्याजवळ विश्वंभर अंबाझाडाचा फोटो होता. तो राज्यपाल महोदयांना देत असताना साहेब राज्यपाल महोदयांना म्हणाले,हे माझ्या लातूरचे शेतकरी आहेत. राज्यपालांशी त्यांनी माझा परिचय करून दिला,तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. १९८२ साली साहेब प्रथमच मंत्री झाल्यानंतर त्यांनी मला एक पत्र पाठवले होते. ते पत्र आज देखील माझ्याकडे मी जपून ठेवले आहे.४२ वर्षानंतर देखील मला साहेबांची आठवण व साहेबांचा माझ्या प्रति असलेला स्नेह याची आठवण ते पत्र करून देत असते.लातूर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात साहेबांनी मी निर्माण केलेल्या आयुर्वेदिक गुळाची चव चाखून तेथे उपस्थित बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांना माझ्या कार्या विषयी अवगत करून दिले.

    साहेबांनी त्यांच्या जीवनात कधीही कोणाही विषयी आकस बाळगला नाही. एका दैनिकाच्या संपादकाने साहेबांच्या विरोधात खूप प्रचार केला. मात्र साहेबांनी कधीही ती बाब मनाला लावून घेतली नाही. एकदा त्याच संपादकास बायपास सर्जरी करण्याची गरज भासली.तेंव्हा ते माझ्याकडे आले व आर्थिक अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना साहेबांची भेट घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती साहेबांना भेटली, साहेबांनी अगदी हसतमुखाने त्यांच्याशी संवाद साधला व संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून ऑपरेशनची सोय करून दिली व ऑपरेशन झाल्यानंतर साहेब स्वतः त्या संपादकास जाऊन भेटले.एवढ्या दिलदार मनाचा व्यक्ती आमच्या लातूरचा होता याचा आनंद नेहमीच मनाला वाटत असतो.
    - श्री.प्रकाश विश्वंभर झुंजे पाटील(प्रगतशील शेतकरी) हरंगुळ ता.जि.लातूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 219 Nov 13, 2022
     
    साहेब स्‍वत: रिबीन कापण्‍यासाठी आले होते...
    लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी नेहमीच ग्रामीण भागातील विकासाला डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली. शेतक-यांच्‍या जिवनात आर्थिक परीवर्तन होण्‍यासाठी उत्‍तम शेतीशिवाय पर्याय नाही. शेती सोबतच जोड धंदा असावा जेणे करून अधिकचे उत्‍पन्‍न शेतक-यांना मिळू शकेल व त्‍यांचे जिवनमान उंचावेल असे त्‍यांना नेहमी वाटायचे.

    मी लातूर जिल्‍हा सहकारी दुध संकलन अधिकारी म्‍हणून काम करत असताना साहेबां सोबत अनेकदा भेट व्‍हायची. भेटी दरम्‍यान ग्रामीण भागाच्‍या विकासाविषयीची तळमळ मला दिसून यायची. उस्‍मानाबाद मधून वेगळा होऊन लातूर जिल्‍हा निर्माण झाला व उदगीर येथे दुध संघाची स्‍थापना झाली. याच दरम्‍यान केंद्र सरकारकडून दुग्‍ध योजना टप्‍पा २ ची घोषणा झाली व त्‍यात लातूर जिल्‍ह्याचा समावेश झाला. साहेब त्‍यादरम्‍यान राज्‍याचे मंत्री होते व काही दिवस दुग्‍ध विभागाचा पदभार त्‍यांच्‍याकडे दिला होता. आनंद पॅटर्नच्‍या धर्तीवर आपल्‍या देखील भागात दुग्‍ध निर्मिती व्‍हावी या हेतूने त्‍यांनी प्रत्‍यन सुरू केले. शासनाच्‍या योजने विषयी ग्रामीण भागातील लोकांना माहिती व्‍हावी यासाठी विशेष अभियान राबवण्‍याच्‍या सुचना अधिका-यांना त्‍यांनी दिल्‍या होत्‍या. प्रत्‍येक सभेत भाषणाच्‍या शेवटी ते स्‍वत: दुग्‍ध व्‍यवसायाचे महत्‍व सांगायचे. त्‍यामुळे आपल्‍या भागात दुग्‍ध व्‍यवसायाला चालना मिळत गेली. प्रत्‍येक गावात किमान १०० लीटर दूध निर्माण व्‍हावे असा आग्रह ते धरायचे. बाभळगाव येथे देखील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला.
    या दरम्‍यान मोठ्या प्रमाणात गाई वाटप केल्‍या. दूध संकलनासाठी गाडीची व्‍यवस्‍था करून देण्‍यात आली. यासोबतच पशुखाद्य देखील पुरवण्‍यात आले. बाभळगाव येथे प्रवेशव्‍दारावर दूध डेअरीचे ऑफीस सुरू करण्‍यात आले होते. तिथे दुधाची गुणवत्‍ता तपासण्‍यासाठी टेस्‍टींग साहित्‍य, फॅटमशीन, मिल्‍कोटेस्‍टर हे सर्व साहित्‍य उपलब्‍ध करून दिले होते. साहेब योगा-योगाने गावातच होते. मात्र कामाच्‍या व्‍यस्‍ततेमुळे ते डेअरी ऑफीसच्‍या उद्घाटनाला येतील की नाही असे वाटू लागले. या विषयी बी.व्‍ही.काळे साहेबांना मी बोललो. वेळात वेळ काढून साहेब स्‍वत: तर आलेच सोबत स्‍व.दगडोजीराव (दादा) यांना देखील घेऊन आले. साहेबांनी स्‍वत: रिबीन कापून आम्‍हाला प्रोत्‍साहन दिले. एकदा अशाच एका भेटी दरम्‍यान मिल्‍क मॅन म्‍हणून ओळखले जाणारे वर्गीस कुरीयन यांच्‍याशी भेटीचा प्रसंग त्‍यांनी सांगितला होता. मंत्री व मुख्‍यमंत्री या नात्‍याने साहेबांनी कोट्यावधीचा निधी दुग्‍ध व्‍यवसाय वाढीसाठी दिला होता.
    - श्री. ज्ञानदेव नारायण कदम, गाधवड, ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 218 Nov 06, 2022
     
    तुलसी विवाहासाठी ऊस मागून आणावा लागत होता...
    आपल्‍या भागातील साखर कारखाने आहेत म्‍हणूनच आपल्‍या भागात आर्थिक सुबत्‍ता निर्माण झाली आहे. याची अनेक उदाहरणे गावा-गावात आहेत. ऊसाच्‍या शेतीमुळे जगणं सहज झालं. विलासराव देशमुख साहेब यांच्‍यामुळेच हा बदल घडू शकला. एकदा साहेब जेंव्‍हा लातूर दौ-यावर आले होते. तेंव्‍हा गावातील आर्थिक विकासावर काही मंडळींसोबत साहेबांची चर्चा सुरू होती. तेंव्‍हा मी साहेबांना म्‍हणालो, एक काळ आपल्‍याकडे असा होता की, ऊसाची शेती कशी व किती किफायदार आहे हे माहीत नव्‍हते. आपल्‍या लोकांना तुलसी विवाहासाठी ऊस इतरांकडून मागून आणावा लागत होता. आता अशी परस्थिती आहे की, हजारो टन ऊसाचे उत्‍पादन आपले लोक घेत आहेत. हे ऐकूण, हे बरोबर आहे आपण एक काळ तसा देखील पाहिला आहे. आपल्‍या शेतक-यांनी शेतात कष्‍ट घेऊन चांगला ऊस पिकवला म्‍हणूनच हा चमत्‍कार घडू शकला अस साहेब म्‍हणाले. साहेबांच्‍या मनाचा मोठेपणा होता की ते कधी स्‍वत:ला श्रेय देत नव्‍हते. साहेब आणि आमच्‍या जटाळ परिवाराचा स्‍नेह अतुट होता. स्‍व.दगडोजीराव दादा देशमुख व माझे वडील बाबुराव जटाळ यांची मैत्री होती. साखर कारखान्‍यावर मी संचालक होतो तेंव्‍हा नंतरच्‍या निवडणुकीत स्‍थानीक राजकारणामुळे मला उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्‍यावर मी रात्री १२ वाजता साहेबांना मुंबई येथे फोन लावला व माझे म्‍हणणे सांगितले. तेंव्‍हा साहेबांनी माझी उमेदवारी कायम ठेवली.
    आमचा जिल्‍हा परिषद मतदारसंघ हा पुरूषासाठी राखीव झाल्‍यानंतर माझ्या पत्‍नीस साहेबांनी लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंकेवर संचालक म्‍हणून घेतले व व्‍हा.चेअरमन देखील केले. विलासराव देशमुख साहेबांना ग्रामीण भाग व तेथील कार्यकर्ते तोंड पाठ होते. चाकूरकर साहेबांच्‍या प्रचारासाठी ते आमच्‍या गावात अनेकदा यायचे. खरं तर तेंव्‍हा पासूनच आमची चांगली ओळख झाली होती. त्‍या काळी नाष्‍ट्याला पोहे वगैरे फारसं नसायचे. त्‍यामुळे ज्‍वारीच्‍या पापड्या, खारूड्या असे पदार्थ त्‍यांना खायला द्यायचो. साहेब देखील आवडीने खायचे. एवढ साध व्‍यक्‍तीमत्‍व साहेबांचे होते. साहेबांमुळे सहकार क्षेत्रातल्‍या विविध पदावर मला व माझ्या परीवाराला काम करता आले याचे समाधान असून साहेबांनी आमच्‍यासाठी केलेले काम आम्‍ही कधीच विसरू शकणार नाहीत.
    - श्री. श्रीरंग बाबूराव जटाळ, भातांगळी, ता.जि.लातूर
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 217 Oct 30, 2022
     
    साहेबांकडून खूप शिकायला मिळाले...
    लोकनेते विलासराव देशमुख हे दूरदृष्‍टी असलेले महान नेते होते. या महान नेत्‍याचा सहवास आम्‍हाला लाभला हे भाग्‍यच मानतो. साहेबांचा संघर्षाचा व सत्‍तेचा काळ मी जवळून पाहिला आहे. १९९६ ते १९९९ या काळात आमच्‍या दक्षिण सोलापुरात विलासराव देशमुख विचार मंचाची स्‍थापना करून जवळपास १५ शाखा आम्‍ही सुरू केल्‍या होत्‍या. साहेबांचे विचार जनसामांन्‍या पर्यंत पोहोंचवण्‍याचे काम करत असताना अनेकदा साहेब सोलापूरला आले की तुळजापूर नाक्‍यावर जावून तिथे जोरदार स्‍वागत आम्‍ही करायचो. सोलापूर येथे पाणी परिषद आयोजित केली गेली होती. सुशिलकुमार शिंदे तेंव्‍हा खासदार होते. साहेब देखील त्‍या कार्यक्रमास आवर्जून आले होते. त्‍या कार्यक्रमातील साहेबांचे भाषण अप्रतीम होते. तेंव्‍हाच्‍या युती सरकारवर घणाघाती टिका करत साहेब म्‍हणाले, भाजप - सेनेचे सरकार हे रिमोट कंट्रोलने चालणारे आहे. या सरकारने तो रिमोट आता शेतक-यांच्‍या हातात द्यायला हवा जेणे करून किमान पाणी तरी वेळेवर शेतक-यांना मिळेल असे सांगत नेता कसा असावा, कार्यकर्ता कसा घडवला जावा अशा विविध मुद्यांवर साहेबांनी केलेले भाषण आज देखील माझ्या स्‍मरणात आहे.
    मी सुत्रसंचलनाचे काम करत असल्‍याने एकदा प्रणीतीताई शिंदे यांच्‍या कार्यक्रमात विलासराव देशमुख साहेबांचे एक वाक्‍य त्‍यांना एैकवले, साहेब म्‍हणायचे राजकारणात चढ उतार हे येतच असतात अनेकदा अडचणीच्‍या प्रसंगात तुम्‍हाला जर कोणी वाचवणारा असेल तर ते तुम्‍ही केलेले कामच तुम्‍हाला वाचवू शकते. त्‍यामुळे जनतेत जा, त्‍यांची कामे करा असा जो संदेश साहेबांनी दिला होता तो मी बोलून दाखवला. सर्वांना तो संदेश खूप आवडला. टाळ्या वाजवून सर्वांनी त्‍याचे स्‍वागत केले. साहेबांनी त्‍यांच्‍या सोबत घडलेला एक किस्‍सा सांगितला होता. साहेब शिक्षणमंत्री असताना त्‍यांना एका महाविद्यालयाच्‍या उद्घाटनासाठी बोलावले होते. मात्र त्‍यानंतर राजकीय परस्थितीमुळे उद्योगमंत्री झाले. ठरल्‍याप्रमाणे महाविद्यालयाच्‍या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास साहेब आले. व्‍यासपीठावर तत्‍कालीन मुख्‍यमंत्री होते. तेंव्‍हा साहेब म्‍हणाले, जेंव्‍हा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले तेंव्‍हा मी शिक्षणमंत्री होतो. मधल्‍या काळात जो प्रकार घडला ते पाहून मुलगा जरा उद्योगी दिसतोय असं समजून मला उद्योग मंत्री केले गेले असावे असं जेंव्‍हा साहेब म्‍हणाले तेंव्‍हा मुख्‍यमंत्री महोदयांसोबतच उपस्थित सर्वांना हसू आवरता आले नाही. साहेबांचा सहवास, दिलदारपणा, त्‍यांची भाषणशैली आज देखील आठवलं की मन भरून येतं. तासंन तास साहेबांची भाषणं आज देखील मी मोबाईलवर एैकत असतो.
    - श्री. अशोक गुंडप्‍पा कस्‍तुरे, मुश्‍ती, दक्षिण सोलापूर.
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 216 Oct 23, 2022
     
    २७ मार्च १९८२ चा तो दिवस...
    जिवन जगत असताना अनेक गोष्‍टी आपल्‍या आयुष्‍यात घडत असतात. काळाच्‍या ओघात त्‍यापैकी काही लक्षात राहतात तर काही विसरून जातात. लक्षात त्‍याच गोष्‍टी राहतात ज्‍या आपल्‍याला आनंद देणा-या असतात. माझ्या देखील आयुष्‍यात असाच एक प्रसंग आहे जो माझ्या जिवनात कायम लक्षात राहिल. तो प्रसंग व दिवस म्‍हणजे २७ मार्च १९८२ हाच तो दिवस जेंव्‍हा लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्‍या हस्‍ते माझा सत्‍कार झाला. तो सत्‍कार माझ्या आयुष्‍यातील पहिलाच सत्‍कार होता. जो एक मोठ्या नेत्‍याच्‍या हस्‍ते झाला. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे माझे महाविद्यालयीन शिक्षण पार पडले. त्‍या दरम्‍यान बी.कॉम तृतीय वर्षातील माझ्या एकूण आचरणा बद्दल व गुणवत्‍ते बद्दल मला आदर्श विद्यार्थी हा पुरस्‍कार देऊन सत्‍कार केला गेला. युवकांना उद्देशून विलासराव देशमुख साहेबांनी केलेले भाषण फारच अप्रतीम व प्रोत्‍साहन देणारे होते. युवकांचे भविष्‍यातील भारताच्‍या जडण-घडणीत किती मोलाचे योगदान भविष्‍यात असणार आहे या विषयी त्‍यांनी जे मुद्दे प्रभावी शैलीतून मांडले त्‍यातून मला खूप प्रेरणा व प्रोत्‍साहन मिळाले. ती प्रेरणा घेऊनच मी पुढचे माझे शिक्षण पूर्ण केले. त्‍यानंतर मी श्रीकृष्‍ण कनिष्‍ठ महाविद्यालय गुंजोटी येथे नौकरीसाठी निवडलो गेलो. ३० वर्ष प्रामाणिकपणे सेवा करत असताना विलासराव देशमुख साहेबांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत राहिलो. सरपंच ते राज्‍याचा मुख्‍यमंत्री व नंतर देशाचे मंत्री असा प्रवास त्‍यांना सहज नव्‍हता. ज्‍याप्रकारे त्‍यांनी अडचणींवर मात करून यश मिळवले व लाखो लोकांचा जनसमुदाय कमावला ते कोणत्‍याही व्‍यक्‍तीस प्रेरणादायी आहे.
    साहेब मुख्‍यमंत्री असताना गुंजोटी येथे दामोदर पतंगे यांच्‍या हिरक महोत्‍सवानिमित्‍त आले होते. तेंव्‍हा मी त्‍यांची भेट घेतली. सोबत साहेबांनी 27 मार्च १९८२ रोजी केलेल्‍या सत्‍कारांचा फोटो होता. तो त्‍यांना दाखवला तेंव्‍हा सध्‍या काय करता तुम्‍ही असं त्‍यांनी विचारलं. मी म्‍हणालो याच विद्यालयात प्राध्‍यापक म्‍हणून काम करतोय. तेंव्‍हा पाठीवर हात ठेवत छान, असंच काम करत रहा असं जेंव्‍हा ते मला म्‍हणाले तेंव्‍हा मला तो आनंद गगनात मावत नव्‍हता.
    - प्रा.श्री. खंडू किशनराव बनसोडे, गुंजोटी, ता.उमरगा, जि.उस्‍मानाबाद
    Share 1000 Views Read more
  • #आठवणीसाहेबांच्या 215 Oct 16, 2022
     
    आणि पुढच्या दोन मिनिटात साहेबांचं बोलावणं आलं.
    लोकनेते विलासराव देशमुख साहेब व आमच्या गंगापूर गावाचे खास असे नाते होते. चाकूरकर साहेब व विलासराव साहेब वर्षातून किमान एकदा तरी आमच्या गावात कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचे. आमच्या गावातील विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. आमचं कुटुंब साहेबांच्या विचाराला मानणारे असल्याने मी देखील साहेबांचा चाहता झालो. आवर्जून साहेबांची भाषण मी ऐकायचो.माझे वडील साहेबांना खूप मानायचे परंतु त्यांनी कधी साहेबांना काहीच मागितले नाही.आमच्या गावातील शिवहार आप्पा कानडे यांचे देखील साहेबांशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते.

    एकदा कानडे अप्पांसोबत माझे वडील मुंबईला वर्षा या निवासस्थानी साहेबांना भेटायला गेले. आज देखील माझे वडील तेंव्हाच्या आठवणी सांगतात. प्रचंड गर्दी तेथे होती त्यामुळे साहेबांची भेट अशक्य वाटत होती.तेव्हा एका चिठ्ठीवर नाव लिहून ती आत साहेबांकडे पाठवली व पुढच्या दोन मिनिटातच साहेबांचे बोलावणं आलं.हे पाहून भेटीसाठी आलेली इतर मंडळी कुतूहलाने वडिलांकडे पाहत होती. २००६ साली मी बीड जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो. प्रशिक्षणानंतर मला गेवराई येथे पोस्टिंग मिळाली, नुकतेच लग्न झालेले आणि वडिलांना बैलाने मारल्याने त्यांची तब्येत ठीक नव्हती. बीड वरून लातूरला बदली करून घ्यावी या प्रयत्नात मी होतो. मात्र नियमाने ते होऊ शकत नव्हती या संदर्भात शिवहार आप्पा यांच्याकडे मी आणि वडील गेलो.त्यांना बदली संदर्भात सांगितले. योगा-योगाने साहेब लातूर दौऱ्यावर होते.आम्ही बाभळगावला गेलो तिथे प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत सर्वांशी बोलत साहेब पायऱ्या उतरत खाली आले.शिवहार अप्पांना पाहताच साहेब म्हणाले,अप्पा काय काम काढलं? अप्पांनी माझ्या बदली संदर्भात सांगितले. तेंव्हा त्यांनी अमित साहेबांना भेटायला सांगितले. तिथून आम्ही ऑफिसला आलो तिथे अमित साहेबांची भेट झाली. तोपर्यंत साहेबांचा निरोप त्यांना मिळाला होता. अमित साहेब म्हणाले, काळजी करू नका काम होऊन जाईल. त्यानंतर मी गेवराईला ड्युटी साठी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांची पायी दिंडी होती. औरंगाबाद- जालना रोडवर मला बंदोबस्त दिला होता. सकाळी ११ वाजता पोलीस उपनिरीक्षक राजू खराडे तिथे आले व लातूरला माझी बदली झाली असून तात्काळ तेथे रुजू होण्याचे आदेश आहेत असं ते मला म्हणाले, तेंहा माझा विश्वासच बसेना. अशक्य ते शक्य केवळ विलासराव देशमुख साहेबांमुळे घडू शकले होते.
    - श्री मंगेश भरत मुळे, गंगापूर ता.जी.लातूर.
    Share 1000 Views Read more
Load more

धिरज विलासराव देशमुख

आमदार , महाराष्ट्र विधानसभा , लातूर (ग्रामीण), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

निवास : मु. पोस्ट बाभळगाव, ता. जि. लातूर – महाराष्ट्र
संपर्क कार्यालय : B-44, एकमत भवन, लातूर - 413531, महाराष्ट्र

कॉल करा:  +91 9023599999

ई- मेल पाठवा:  connect@dhirajvilasraodeshmukh.com

सेवेची अट | गोपनीयता धोरण
कॉपीराइट  © २०२२ धिरज विलासराव देशमुख. सर्व हक्क राखीव
रचनाकार नेटिझन्स आय.टी.ई.एस.